शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपील’मुळे तरुणींचा बळी

By admin | Updated: May 28, 2014 02:02 IST

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे

पुणे : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येणार्‍या आय पीलच्या रंजक जाहिरातींना भुलून महाविद्यालयीन तरुणी या गोळ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येऊ लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘मासिक पाळी आणि स्वच्छता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सूथ हेल्थ केअरच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवदा तेलंग, ‘युनिसेफ’चे अधिकारी युसूफ कबीर, इंग्लंडमधील माजी पोलीस अधिकारी मोना सेलडोन, प्राध्यापक अपर्णा दीक्षित, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शाह, मीना शाह या तज्ज्ञांनी भाग घेतला. डॉ. तेलंग म्हणाल्या, ‘कोणतीही सुरक्षितता न बाळगता शरीरसंबंध आल्यानंतर गर्भधारणा नको असल्यास १२ तासांच्या आत आय पील गोळी घेणे आवश्यक असते. ही गोळी एकदाच घ्यायची असते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत पाळी येणे अपेक्षित असते. मात्र, पाळी आली नाही की पुन्हा गोळी घेतली जाते. जे पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, जाहिरातींमधील चुकीच्या माहितीमुळे या गोळ्या चॉकलेटसारख्या खाल्ल्या जात आहेत. माझ्याकडे दररोज महाविद्यालयीन ४ ते ५ तरुणी आय पील ३ ते ४ वेळा घेतल्यानंतरही पाळी न आल्याने येतात. या गोळ्या सारख्या घेतल्या तर पाळीचे चक्र बिघडून संबंधित महिलेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कबीर यांनी ‘महिला आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता’ या विषयात देशातील व महाराष्टÑातील सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महाराष्टÑ आणि देशात मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत महिलांमध्ये खूप वाईट स्थिती असून अनेक गैरसमजुती आहेत. देशात ११ ते १९ वयोगटांतील ११ कोटी ५० लाख मुली आहेत, त्यांपैकी ६ ते ८ कोटी मुली शाळांमध्ये जातात. त्यांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत. लातूर, चंद्रपूर आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये ९० टक्के मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, हे माहितीच नसल्याचे ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. ६० ते ७० टक्के मुली या काळात शाळेतच जात नाहीत. ५० टक्के मुलींना पाळी हा एक आजार असल्याचे वाटते. आजही देशात ८८ टक्क्यांपर्यंत महिला सॅनिटरी नॅपकीनऐवजी कापडाचाच वापर करतात.’ सेलडोन यांनी ‘महिलांवरील अत्याचार आणि कायदे’ या विषयावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने जग हादरले होते, यामुळे केंद्र शासनाने तातडीने पावले उचलत यासंबंधीचे कायदे कडक केले. मात्र आजही बलात्काराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण भारतात खूप आहे मात्र शिक्षा मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.’ डॉ. विनोद शाह, मीना शाह, दीक्षित यांनीही मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)