शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

‘आयपील’मुळे तरुणींचा बळी

By admin | Updated: May 28, 2014 02:02 IST

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे

पुणे : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येणार्‍या आय पीलच्या रंजक जाहिरातींना भुलून महाविद्यालयीन तरुणी या गोळ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येऊ लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘मासिक पाळी आणि स्वच्छता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सूथ हेल्थ केअरच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवदा तेलंग, ‘युनिसेफ’चे अधिकारी युसूफ कबीर, इंग्लंडमधील माजी पोलीस अधिकारी मोना सेलडोन, प्राध्यापक अपर्णा दीक्षित, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शाह, मीना शाह या तज्ज्ञांनी भाग घेतला. डॉ. तेलंग म्हणाल्या, ‘कोणतीही सुरक्षितता न बाळगता शरीरसंबंध आल्यानंतर गर्भधारणा नको असल्यास १२ तासांच्या आत आय पील गोळी घेणे आवश्यक असते. ही गोळी एकदाच घ्यायची असते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत पाळी येणे अपेक्षित असते. मात्र, पाळी आली नाही की पुन्हा गोळी घेतली जाते. जे पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, जाहिरातींमधील चुकीच्या माहितीमुळे या गोळ्या चॉकलेटसारख्या खाल्ल्या जात आहेत. माझ्याकडे दररोज महाविद्यालयीन ४ ते ५ तरुणी आय पील ३ ते ४ वेळा घेतल्यानंतरही पाळी न आल्याने येतात. या गोळ्या सारख्या घेतल्या तर पाळीचे चक्र बिघडून संबंधित महिलेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कबीर यांनी ‘महिला आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता’ या विषयात देशातील व महाराष्टÑातील सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महाराष्टÑ आणि देशात मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत महिलांमध्ये खूप वाईट स्थिती असून अनेक गैरसमजुती आहेत. देशात ११ ते १९ वयोगटांतील ११ कोटी ५० लाख मुली आहेत, त्यांपैकी ६ ते ८ कोटी मुली शाळांमध्ये जातात. त्यांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत. लातूर, चंद्रपूर आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये ९० टक्के मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, हे माहितीच नसल्याचे ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. ६० ते ७० टक्के मुली या काळात शाळेतच जात नाहीत. ५० टक्के मुलींना पाळी हा एक आजार असल्याचे वाटते. आजही देशात ८८ टक्क्यांपर्यंत महिला सॅनिटरी नॅपकीनऐवजी कापडाचाच वापर करतात.’ सेलडोन यांनी ‘महिलांवरील अत्याचार आणि कायदे’ या विषयावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने जग हादरले होते, यामुळे केंद्र शासनाने तातडीने पावले उचलत यासंबंधीचे कायदे कडक केले. मात्र आजही बलात्काराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण भारतात खूप आहे मात्र शिक्षा मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.’ डॉ. विनोद शाह, मीना शाह, दीक्षित यांनीही मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)