शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीसगाव-चाळीसगाव दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: January 23, 2017 02:29 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात राहावे लागले आहे़महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाच्या विसंगती, टोलवाटोलवीमुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील जनतेला अंधारात राहावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ या भागात कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे विजेचे वेळेवर दुरुस्तीचे काम केले जात नाही़ भोर येथील महावितरणच्या आॅफिसमध्ये अधिकाऱ्यांना माहिती किंवा तक्रार देण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी गेल्यास चार-चार दिवस अधिकारी भेटत नाहीत़ संबंधित विभागाचे अधिकारी पुणे तर कर्मचारी भोर येथे निवासी असल्याने भागात वीज गेली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत वीज येण्याची वाट पाहावी लागते़ वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात ग्रामदैवतांच्या यात्रा चालू आहेत, मात्र वीज नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे़ या भागात पाणी असतानाही वीज नसल्यामुळे महिलांना अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे़ महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला वेठीस धरण्यात येत आहे़ (वार्ताहर)