शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

महामार्गावर वाहनांच्या रांगा

By admin | Updated: July 21, 2014 03:57 IST

येथे लाखो पर्यटकांनी गर्दी केल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर किमान पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या

लोणावळा : येथे लाखो पर्यटकांनी गर्दी केल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर किमान पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यटकांना अर्ध्या रस्त्यामधूनच परतीचा मार्ग धरावा लागला, तर लोणावळेकरांना या कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला़पावसाळी पर्यटनासाठी व भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटकांनी रविवारी लोणावळ्याकडे धाव घेतली. शहरात येणारे सर्व रस्ते वाहतूक कोंडीने बंद पडले होते़ पुण्याकडून येताना वलवण गावाकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत, तर मुंबईकडून येणाऱ्या मार्गावर दर्ग्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी अर्ध्या रस्त्यामधूनच माघारी परतण्याचा पर्याय स्वीकाराला़ भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर तीच स्थिती होती़ सुमारे पाच ते सहा किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने सकाळी निघालेली वाहने दुपारनंतर धरण परिसरात पोहचली़ तेथेदेखील पर्यटकांच्या तुफ ान गर्दीमुळे पर्यटकांना वर्षाविहाराचा आनंद घेता न आल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ टायगर पॉइंट, गिधाड तलाव, राजमाची गार्डन, टायगर व्हॅली, सनसेट पॉइंट, सहारा पूल धबधबा या सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाल्याचे लोणावळेकरांनी अनुभवले़ प्रचंड वाहतूककोंडीने २ दिवसांपासून लोणावळेकरांचे जनजीवन कोलमडले आहे़ यातच पावसाची संततधार सुरू असल्याने वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले होते़ वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने दर शनिवारी व रविवारी अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)