शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

भाजीविक्री ‘स्वाइप’

By admin | Updated: November 16, 2016 02:48 IST

बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने

पिंपरी : बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने सुट्या पैशाविना भाजीखरेदी अवघड झाली आहे. दहा रुपयांची मेथीची भाजी असो किंवा ३० रुपये किलो बटाटे, टॉमेटो असा भाजीपाला खरेदीसाठी आता सुट्या पैशांची गरज भासणार नाही. त्यावर चिंचवड मंडईतील तरुणाने उपाय शोधला असून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर भाजीमाल खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध अभियान छेडले असून, मागील आठवड्यात एका रात्रीत पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे किरकोळ खरेदी करण्यासाठी नागरिकांना चलन उपलब्ध नाही. शंभर-पन्नासच्या नोटा बाजारात उपलब्ध नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. हातात पाचशे, हजाराची नोट असतानाही केवळ सुटे पैसे नसल्याने भाजी, किराणा मालाची खरेदी करणे अवघड झाले आहे. या विषयी गरुड म्हणाले, ‘‘भाजीपाला म्हटले, की सुट्या पैशांचा मोठा प्रश्न असतो. कधी-कधी सुट्या पाच रुपयांसाठी ग्राहकांना फिरण्याची वेळ येते. मात्र, डेबिट आणि के्रडिट कार्डाद्वारे स्वाइप करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने सुट्या पैशांची चणचण भासणार नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंडईतील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या सेवेसाठी आम्ही कोणताही वेगळा चार्ज आकारत नाही. त्यामुळे जेवढे भाजीपाल्याचे बिल आहे, तेवढेच बिल मशिनच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)