शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

इंदापूरमध्ये सायंकाळी होणार भाजीपाल्याचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

बारामती: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बाजार दररोज ...

बारामती: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बाजार दररोज सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, सायंकाळी बाजार सुरू करणारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.

इंदापूर शहरातील मुख्य बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. ३०) या उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये बहुतांश शेतकरी भाजीपाला पिके करत असतात. उजनी धरणालगतच्या पट्टा, नीरा नदीच्या परिसरात मोठ्याप्रमाणात तरकारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हा भाजीपाला नारायणगाव, पुणे, नवी मुंबई, सोपापूर आदी बाजार समित्यांमध्ये पाठवला जात होते. दूर अंतरामुळे वाहतूक करताना शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत होता. भाजीपाला नाशवंत असल्याने या सर्व प्रक्रियेमध्ये एकदोन दिवस उशिरा भाजीपाला बाजार समितीमध्ये पोहोचला जात असे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या सर्वबाबींचा विचार करून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर शहरातच भाजीपाला बाजार सुरू केला. या बाजारास शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ८० आडते व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सायंकाळी बाजार सुरू केल्यामुळे दिवसभर तोडा केलेल्या फळभाज्या सायंकाळीच्या सुमारास बजारात लिलाव पद्धतीने विक्रीकरिता मांडल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

इंदापूर, बारामती, माढा, माळशिरस, करमाळा तसेच पुणे, सोलापूर,उस्मानाबाद, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार यांची देखील भाजीपाला बाजार सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. सदरील बाजारपेठ दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या भाजीपाला बाजारच्या उद्घाटनप्रसंगी संचालक मधुकर भरणे, मेघशाम पाटील, संग्रामसिंह निंबाळकर,रोहित मोहोळकर, अंकुशराव रणमोडे, महावीर गांधी, सुभाष दिवसे, संतोष वाबळे, दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे,भाऊसाहेब सपकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी,आडत व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.

पुढील महिन्यात पानमळा, पेरू बाजार सुरू करणार...

इंदापूर तालुका हा सर्वाधिक फळबागा असणारा तालुका आहे. इंदापूर बाजार समितीचा डाळिंब बाजार सर्वत्र प्रसिद्ध आहे. या बाजारामुळे तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. सध्या तालुक्यात पेरूबाग लागवडीखाली मोठे क्षेत्र आले आहे. तर उजनीच्या पट्ट्यात मोठ्याप्रमाणात पानमळ्याच्या लागवडी आहेत. येथील शेतकऱ्यांना देखील हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी पुढील काही दिवसांत पेरू आणि पानमळा बाजार सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.

- दत्तात्रय फडतरे

सभापती, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला बाजाराला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

३१०८२०२१-बारामती-०३