शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

इंदापूरमध्ये सायंकाळी होणार भाजीपाल्याचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

बारामती: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बाजार दररोज ...

बारामती: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बाजार दररोज सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, सायंकाळी बाजार सुरू करणारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.

इंदापूर शहरातील मुख्य बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. ३०) या उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये बहुतांश शेतकरी भाजीपाला पिके करत असतात. उजनी धरणालगतच्या पट्टा, नीरा नदीच्या परिसरात मोठ्याप्रमाणात तरकारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हा भाजीपाला नारायणगाव, पुणे, नवी मुंबई, सोपापूर आदी बाजार समित्यांमध्ये पाठवला जात होते. दूर अंतरामुळे वाहतूक करताना शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत होता. भाजीपाला नाशवंत असल्याने या सर्व प्रक्रियेमध्ये एकदोन दिवस उशिरा भाजीपाला बाजार समितीमध्ये पोहोचला जात असे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या सर्वबाबींचा विचार करून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर शहरातच भाजीपाला बाजार सुरू केला. या बाजारास शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ८० आडते व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सायंकाळी बाजार सुरू केल्यामुळे दिवसभर तोडा केलेल्या फळभाज्या सायंकाळीच्या सुमारास बजारात लिलाव पद्धतीने विक्रीकरिता मांडल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

इंदापूर, बारामती, माढा, माळशिरस, करमाळा तसेच पुणे, सोलापूर,उस्मानाबाद, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार यांची देखील भाजीपाला बाजार सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. सदरील बाजारपेठ दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या भाजीपाला बाजारच्या उद्घाटनप्रसंगी संचालक मधुकर भरणे, मेघशाम पाटील, संग्रामसिंह निंबाळकर,रोहित मोहोळकर, अंकुशराव रणमोडे, महावीर गांधी, सुभाष दिवसे, संतोष वाबळे, दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे,भाऊसाहेब सपकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी,आडत व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.

पुढील महिन्यात पानमळा, पेरू बाजार सुरू करणार...

इंदापूर तालुका हा सर्वाधिक फळबागा असणारा तालुका आहे. इंदापूर बाजार समितीचा डाळिंब बाजार सर्वत्र प्रसिद्ध आहे. या बाजारामुळे तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. सध्या तालुक्यात पेरूबाग लागवडीखाली मोठे क्षेत्र आले आहे. तर उजनीच्या पट्ट्यात मोठ्याप्रमाणात पानमळ्याच्या लागवडी आहेत. येथील शेतकऱ्यांना देखील हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी पुढील काही दिवसांत पेरू आणि पानमळा बाजार सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.

- दत्तात्रय फडतरे

सभापती, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला बाजाराला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

३१०८२०२१-बारामती-०३