शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

मेघमल्हारद्वारे वरुणराजाला साद; बासरीच्या साह्याने राग गाऊन पाऊस पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:32 IST

प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत.

- चंद्रकांत साळुंके काऱ्हाटी : प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत. मात्र, ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाही. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत.रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का, याबाबत जिरायती भागात चर्चा रंगली असून हा प्रयोग औत्सुक्याचा ठरत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पाडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. काºहाटी येथे २७ आॅक्टोबरपासून दुष्काळावर मात करण्यासाठी कºहाड येथील इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पाडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. त्याचअनुषंगाने या भागात सलग पाच वर्षांनी दुष्काळ असणाऱ्या भागाला पावसापासून दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बासरीद्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग ७ दिवस वाजविण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास दहा ते बारा स्पीकर लावण्यात आले आहेत. दिवस-रात्र बासरी वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काºहाटीजवळील साळुंकी मंदिराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवस रात्र बासरी वाजवून या परिसराला मंत्रमुग्ध केले आहे. सध्या बासरी वाजवून पाऊस पडतो, या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरीवादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक ठिकाणांहून येथे भेट देत आहेत....तर अशा प्रयोगाची गरज भासणार नाहीबासरी वाजून पाऊस पडतोच. या ठिकाणीसुद्धा पाऊस पडेल. मात्र, सध्याचे वातावरण पाहता पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांनी सांगितले. मात्र, या भागांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात अशा प्रयोगाचीदेखील गरज भासणार नाही. झाडांचे रक्षण केल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी मला खात्री असल्याचे रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग येथे प्रथमच राबविण्यात येत आहे. यापूर्वी विमानाद्वारे आकाशात रसायने सोडून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग तालुक्यात राबविण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याचे केंद्रस्थान बारामतीत होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग बारामतीमध्ये राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग होत आहे. गेल्या ६ वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिरायती भाग तहानलेला आहे. या पार्श्वभूमीवर बासरीवादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊस