शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मेघमल्हारद्वारे वरुणराजाला साद; बासरीच्या साह्याने राग गाऊन पाऊस पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:32 IST

प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत.

- चंद्रकांत साळुंके काऱ्हाटी : प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत. मात्र, ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाही. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत.रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का, याबाबत जिरायती भागात चर्चा रंगली असून हा प्रयोग औत्सुक्याचा ठरत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पाडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. काºहाटी येथे २७ आॅक्टोबरपासून दुष्काळावर मात करण्यासाठी कºहाड येथील इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पाडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. त्याचअनुषंगाने या भागात सलग पाच वर्षांनी दुष्काळ असणाऱ्या भागाला पावसापासून दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बासरीद्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग ७ दिवस वाजविण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास दहा ते बारा स्पीकर लावण्यात आले आहेत. दिवस-रात्र बासरी वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काºहाटीजवळील साळुंकी मंदिराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवस रात्र बासरी वाजवून या परिसराला मंत्रमुग्ध केले आहे. सध्या बासरी वाजवून पाऊस पडतो, या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरीवादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक ठिकाणांहून येथे भेट देत आहेत....तर अशा प्रयोगाची गरज भासणार नाहीबासरी वाजून पाऊस पडतोच. या ठिकाणीसुद्धा पाऊस पडेल. मात्र, सध्याचे वातावरण पाहता पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांनी सांगितले. मात्र, या भागांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात अशा प्रयोगाचीदेखील गरज भासणार नाही. झाडांचे रक्षण केल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी मला खात्री असल्याचे रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग येथे प्रथमच राबविण्यात येत आहे. यापूर्वी विमानाद्वारे आकाशात रसायने सोडून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग तालुक्यात राबविण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याचे केंद्रस्थान बारामतीत होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग बारामतीमध्ये राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग होत आहे. गेल्या ६ वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिरायती भाग तहानलेला आहे. या पार्श्वभूमीवर बासरीवादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊस