शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

समाजात मूल्यव्यवस्था रुजविली जावी

By admin | Updated: February 2, 2016 00:49 IST

स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे

पुणे : स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे. शिक्षण, गरिबी अशा प्रश्नांविरोधात आज आवाज उठविला जात नाही. दिवसेंदिवस विषमतेची दरी वाढते आहे. समतेची विटंबाना होताना दिसत आहे. बंधुता एका कुटुबांत तरी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. समता, बंधुता, मूल्यव्यवस्था रुजविण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान आयोजित १७व्या राष्ट्रीय बंधुता संमेलनात रविवारी वैद्य यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या समारोप संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्षा मधुश्री ओव्हाळ, डॉ. विकास आबनावे, डॉ. अशोक पगारिया, प्रकाश रोकडे, शंकर अत्रे आदी व्यासपीठावर होते. माजी उपशिक्षणाधिकारी सुधाकर तांबे, सहायक आरोग्याधिकारी प्रकाश जवलकर, डॉ. भीम गायकवाड, विजयकुमार मर्लेचा, धम्मचारी ज्ञानदूत यांना राज्यस्तरीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अश्विनी धोंगडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. (प्रतिनिधी)