शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वैभवच्या बहादुरीमुळे मुस्कानचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:47 IST

जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची

राजुरी : जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.येडगाव धरणातून कुकडी नदीला, तसेच कुकडी डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे. हा कुकडी डावा बोरी बुद्रुक जाधववाडीमार्गे गेलेला आहे. जाधववाडी (ता. जुन्नर) गावाची श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय ही शाळा कालव्याच्या बाजूला असून येथील शाळेत शिकत असलेली इयत्ता पाचवीमधील मुस्कान बशीर पठाण ही सायकलवरून शाळेत जात होती. तिचे घर कॅनॉलच्या एका बाजूला असून दुसºया बाजूला शाळा आहे. मुस्कान पुलावरून जात असताना तिचा तोल गेला व या पुलाला कठडे नसल्याने ती पाण्यात पडली.ती जेव्हा सायकलसह पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर काही विद्यार्थी शाळेत चालले होते. त्यांच्यापैैकी इयत्ता आठवीत शिकणारा वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारली व ही वाहत जात असलेली मुलगी जवळपास शंभर मीटरवर गेलेली असतानादेखील तिचा पाण्यात पोहत जाऊन तिला पकडले. पुढे पोहत जाऊन कॅनॉलमध्ये शेतकºयांनी टाकलेल्या पाइपलाइनला पकडून बाहेर काढले.विशेष म्हणजे ही मुलगी जेव्हा पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्याने आरडाओरडा केला होता. आरडाओरड झाल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ घटनास्थळी आले होते. परंतु मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तिला वाचवण्यासाठी कोणीही उडी मारली नव्हती. परंतु या चौदावर्षीय मुलाने कुठलाही विचार न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला व सायकल व तिचे दप्तर वाहून गेले.मुख्याध्यापक एस. ए. कसाळ, तसेच राजेंद्र पायमोडे, रामदास जाधव, अविनाश गायकवाड, किशोर गायकवाड, संतोष जाधव, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या बहादूर विद्यार्थ्याचा सत्कार केला. मुलाचा राज्यपातळीवर सत्कार व्हावा, यासाठी विद्यालयाच्या वतीने पाठपुरावा करणार आहे, असे मुख्याध्यापक एस. ए. कुसाळ यांनी सांगितले.