शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पालखीतून थर्माकोल, प्लॅस्टिक हद्दपार, पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:40 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती.

- प्रशांत ननवरेवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षीहि सुस्वरे आळवितीतुका म्हणे होय मानसी संवादआपुलाची वाद आपणासीया अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती. वरील अभंगाद्वारे तुकोबांनी अधोरेखित केलेले पर्यावरण जपण्याचे केलेले आवाहन दुर्लक्षित करुन चालणार नाही. राज्य शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी यंदा संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांनी जपली आहे. दिंड्यांमधुन थर्माकोल, प्लॅस्टिकच्या थाळ्या वाट्यांना मूठमाती देण्यात आली आहे. पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरु सोहळ्यात झाला आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.सोहळाप्रमुख मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांना पर्यावरणाचे महत्व समजले होते. त्यांनी त्यावेळी रचलेल्या अभंगांतून याबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे संस्थानासह वारकरी भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. पावसापासून वापरण्यात येणारा कागद वगळता सोहळ्यात वारकरी भाविकांनी प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी वापरात असणारी प्लॅस्टीक आणि थर्माकोलची ताटे पुर्णपणे वापर थांबविण्यात आला आहे. तसेच, सक्षम दिंड्यांमध्ये स्टील ताटे, वाट्यांचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करीत आहेत.संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा ३३३ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी वारीमध्ये ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तर ३ .५० ते ३.७५ लाख वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ््यासोबत चालत आहेत. निर्मल वारी अभियानाचे देखील संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या सुविधेमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण थांबले आहे. प्रत्येक ठीकाणी २५ एकराचा पालखी तळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दिंड्या एकत्रित केंद्रीत होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासुन याबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, अंथुर्णेसह अकलुजच्या पुढील मुक्कामी असणाऱ्या बोरगांव येथे जागा मिळाल्या आहेत.शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक तळावर सगळ्या विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्या सर्वांकडे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. त्यामुळे जलद गतीने समन्वय साधुन कोणतीली समस्या सोडविण्यास मदत होते. शासनाच्या वतीने सोयीसुविधांबाबत चांगला पाठपुरावा सुरु आहे, असे सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPandharpur Wariपंढरपूर वारी