शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

पालखीतून थर्माकोल, प्लॅस्टिक हद्दपार, पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:40 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती.

- प्रशांत ननवरेवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षीहि सुस्वरे आळवितीतुका म्हणे होय मानसी संवादआपुलाची वाद आपणासीया अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती. वरील अभंगाद्वारे तुकोबांनी अधोरेखित केलेले पर्यावरण जपण्याचे केलेले आवाहन दुर्लक्षित करुन चालणार नाही. राज्य शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी यंदा संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांनी जपली आहे. दिंड्यांमधुन थर्माकोल, प्लॅस्टिकच्या थाळ्या वाट्यांना मूठमाती देण्यात आली आहे. पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरु सोहळ्यात झाला आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.सोहळाप्रमुख मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांना पर्यावरणाचे महत्व समजले होते. त्यांनी त्यावेळी रचलेल्या अभंगांतून याबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे संस्थानासह वारकरी भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. पावसापासून वापरण्यात येणारा कागद वगळता सोहळ्यात वारकरी भाविकांनी प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी वापरात असणारी प्लॅस्टीक आणि थर्माकोलची ताटे पुर्णपणे वापर थांबविण्यात आला आहे. तसेच, सक्षम दिंड्यांमध्ये स्टील ताटे, वाट्यांचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करीत आहेत.संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा ३३३ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी वारीमध्ये ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तर ३ .५० ते ३.७५ लाख वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ््यासोबत चालत आहेत. निर्मल वारी अभियानाचे देखील संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या सुविधेमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण थांबले आहे. प्रत्येक ठीकाणी २५ एकराचा पालखी तळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दिंड्या एकत्रित केंद्रीत होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासुन याबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, अंथुर्णेसह अकलुजच्या पुढील मुक्कामी असणाऱ्या बोरगांव येथे जागा मिळाल्या आहेत.शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक तळावर सगळ्या विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्या सर्वांकडे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. त्यामुळे जलद गतीने समन्वय साधुन कोणतीली समस्या सोडविण्यास मदत होते. शासनाच्या वतीने सोयीसुविधांबाबत चांगला पाठपुरावा सुरु आहे, असे सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPandharpur Wariपंढरपूर वारी