शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

मराठा मोर्चा नियोजनासाठी ड्रोनचा वापर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:11 IST

मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चासाठी पुण्यामधून तसेच लगतच्या महामार्गांवरून मोठ्या प्रमाणावर वाहने जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केले होते.

पुणे : मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चासाठी पुण्यामधून तसेच लगतच्या महामार्गांवरून मोठ्या प्रमाणावर वाहने जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केले होते. विशेष म्हणजे कोठेही कोंडी होऊ नये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्गांवरतातडीची मदत पोचविणे शक्य व्हावे तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता चक्क ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवण्यात येत होते. नियंत्रण कक्षामध्ये बसून स्वत: उपायुक्त अशोक मोराळे नियमनाबाबत सूचना देत होते.मुंबईतील मोर्चाला मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर जाणार असल्याने वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता होती. लाखोंचे जथ्थे वाहनांनी मुंबईकडे जाणार होते. कोल्हापूर, सांगली, साताºयाकडून येणारी वाहतूक कात्रज, बाह्यवळण रस्ता, मुंबई-बंगळुरू महामार्गावरूनच जाणार होती.यासोबतच सोलापूरकडून आलेली वाहने कात्रज, स्वारगेट किंवा नगर रस्त्याकडून मुंबईकडे जाणार होती. मोठ्या प्रमाणावर वाहने येणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडसर होऊ नये, याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली होती. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांनुसार चोख नियोजन करण्यात आले होते.शहरात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे कॅमेरे स्थिर आहेत. त्यामुळे फिरत्या कॅमेºयांची आवश्यकता होती. ड्रोनचा वापर केल्याने कोंडी टाळण्यात पोलिसांना यश आले. बºयापैकी वाहने रात्रीतूनच मुंबईकडे रवाना झाल्याने कोंडी झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.विसर्जन मिरवणुकीवरही ड्रोनद्वारे लक्षगणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक ही पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील आणि कळीची बाब असते. लक्ष्मी रस्त्यावरून मुख्य मिरवणुका जातात. यासोबतच टिळक रस्त्यावरूनही महत्त्वाची मिरवणूक जाते. कुमठेकर रस्त्यावरूनही मंडळांच्या मिरवणुका जात असतात. लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यांवर ठिकठिकाणी चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमेºयांच्या जोडीला यंदा ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. कात्रज चौक, चांदणी चौक आणि वाकड पूल चौकामध्ये तीन ठिकाणी ड्रोन कॅमेरे ठेवण्यात आले होते. ड्रोन कॅमेºयांद्वारे चौकांसह एक किलोमीटरपर्यंत महामार्गावर वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत होते. रस्त्यावर काही अडचण निर्माण झाली किंवा अपघात झाला, रास्ता रोकोसारखी आंदोलने झाली तर तातडीने उपाययोजना करता याव्यात आणि वस्तुस्थिती समजावी याकरिता थेट तिसºया डोळ्याचा उपयोग पोलिसांनी करून घेतला.