शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:58 IST

नियोजनाचा अभाव : वाहनचालक त्रस्त, यंत्रणा ‘मस्त’

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील दैनंदिन वाहतूकव्यवस्था पूर्णपणे बेशिस्त झाली असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परिणामी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पण, यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन दिसत नाही, अशी परिस्थिती आहे.

पुण्यातून आपल्या चारचाकी वाहनातून उरुळी कांचनला येण्यासाठी निघालेल्या नागरिकांना सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी केवळ २९ किलोमीटर प्रवासाला लागत होते. वाहतूककोंडीमुळे जनतेला आपला वेळ, पैसा व इंधन वाया घालवावे लागत असल्याची भावना व्यक्त होत होती. जी तºहा महामार्गावरील वाहतूककोंडीची, तीच गावातील वाहतुकीची झाली आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई- पुणे- दौंड- सोलापूर- हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वेगाड्या उरुळी कांचनमधून जाणाºया लोहमार्गाने जातात. अशा प्रकारे दोन महत्त्वाच्या दळणवळण मार्गांच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत. यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी वाढलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांच्या वापराच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत. या कोंडीतून रुग्णवाहिकाही सुटत नाहीत. याला पर्याय देणे व शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील चारचाकी व अन्य वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीने व अस्ताव्यस्त पार्किंगने पूर्णपणे विस्कळीत झालेली. रविवार हा येथील आठवडेबाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी तर बाहेर पडावे की नाही, अशी वाहतूककोंडीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसते.लांबच्या प्रवासाला निघालेल्या वाहनांना तासन् तास एका जागेवर उभे राहावे लागते.डिझेल-पेट्रोलची अकारण नासाडी, मोठ्या प्रमाणात प्रदूषणवाढवाहतुकीचा भार पेलण्यासाठी रस्ते अकार्यक्षमदोन चाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग बेशिस्तपणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे