शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:58 IST

नियोजनाचा अभाव : वाहनचालक त्रस्त, यंत्रणा ‘मस्त’

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील दैनंदिन वाहतूकव्यवस्था पूर्णपणे बेशिस्त झाली असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परिणामी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पण, यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन दिसत नाही, अशी परिस्थिती आहे.

पुण्यातून आपल्या चारचाकी वाहनातून उरुळी कांचनला येण्यासाठी निघालेल्या नागरिकांना सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी केवळ २९ किलोमीटर प्रवासाला लागत होते. वाहतूककोंडीमुळे जनतेला आपला वेळ, पैसा व इंधन वाया घालवावे लागत असल्याची भावना व्यक्त होत होती. जी तºहा महामार्गावरील वाहतूककोंडीची, तीच गावातील वाहतुकीची झाली आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई- पुणे- दौंड- सोलापूर- हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वेगाड्या उरुळी कांचनमधून जाणाºया लोहमार्गाने जातात. अशा प्रकारे दोन महत्त्वाच्या दळणवळण मार्गांच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत. यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी वाढलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांच्या वापराच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत. या कोंडीतून रुग्णवाहिकाही सुटत नाहीत. याला पर्याय देणे व शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील चारचाकी व अन्य वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीने व अस्ताव्यस्त पार्किंगने पूर्णपणे विस्कळीत झालेली. रविवार हा येथील आठवडेबाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी तर बाहेर पडावे की नाही, अशी वाहतूककोंडीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसते.लांबच्या प्रवासाला निघालेल्या वाहनांना तासन् तास एका जागेवर उभे राहावे लागते.डिझेल-पेट्रोलची अकारण नासाडी, मोठ्या प्रमाणात प्रदूषणवाढवाहतुकीचा भार पेलण्यासाठी रस्ते अकार्यक्षमदोन चाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग बेशिस्तपणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे