शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:58 IST

नियोजनाचा अभाव : वाहनचालक त्रस्त, यंत्रणा ‘मस्त’

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील दैनंदिन वाहतूकव्यवस्था पूर्णपणे बेशिस्त झाली असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परिणामी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पण, यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन दिसत नाही, अशी परिस्थिती आहे.

पुण्यातून आपल्या चारचाकी वाहनातून उरुळी कांचनला येण्यासाठी निघालेल्या नागरिकांना सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी केवळ २९ किलोमीटर प्रवासाला लागत होते. वाहतूककोंडीमुळे जनतेला आपला वेळ, पैसा व इंधन वाया घालवावे लागत असल्याची भावना व्यक्त होत होती. जी तºहा महामार्गावरील वाहतूककोंडीची, तीच गावातील वाहतुकीची झाली आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई- पुणे- दौंड- सोलापूर- हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वेगाड्या उरुळी कांचनमधून जाणाºया लोहमार्गाने जातात. अशा प्रकारे दोन महत्त्वाच्या दळणवळण मार्गांच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत. यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी वाढलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांच्या वापराच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत. या कोंडीतून रुग्णवाहिकाही सुटत नाहीत. याला पर्याय देणे व शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील चारचाकी व अन्य वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीने व अस्ताव्यस्त पार्किंगने पूर्णपणे विस्कळीत झालेली. रविवार हा येथील आठवडेबाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी तर बाहेर पडावे की नाही, अशी वाहतूककोंडीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसते.लांबच्या प्रवासाला निघालेल्या वाहनांना तासन् तास एका जागेवर उभे राहावे लागते.डिझेल-पेट्रोलची अकारण नासाडी, मोठ्या प्रमाणात प्रदूषणवाढवाहतुकीचा भार पेलण्यासाठी रस्ते अकार्यक्षमदोन चाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग बेशिस्तपणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे