शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाविद्यालयांचे संकेतस्थळ होणार अपडेट

By admin | Updated: July 4, 2015 00:19 IST

विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत.

पुणे : विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांतील सुविधा, अभ्यासक्रम, संशोधन, शिष्यवृत्ती, रँकिंग, शिक्षक, प्लेसमेंट अशा परिपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे यूजीसीने सांगितले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी यूजीसीने हे पाऊल उचलले आहे.विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. सध्या सर्वच विद्यापीठे, महाविद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांचे संकेतस्थळ आहेत. या संकेतस्थळावर तेथील अभ्यासक्रम, वसतिगृह, विविध उपक्रम यांची माहिती प्रामुख्याने दिसते. मात्र, इतर माहितीची बहुतेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर वानवाच दिसते. विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेताना संकेतस्थळावर त्या महाविद्यालयाची माहिती घेतात. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. तसेच महाविद्यालयातूनही अनेकदा पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे ऐकीव माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्यातून नंतर अडचणी आल्याचे अनेक प्रकार समोर आले. याअनुषंगाने यूजीसीने सर्व विद्यापीठांना संकेतस्थळ अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(प्रतिनिधी)विद्यार्थी व त्यांच्या पालकांना संस्थेशी संबंधित सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये चालू प्रवेशप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती, अभ्यासक्रमनिहाय प्रवेशक्षमता अपेक्षित आहे. तसेच अभ्यासक्रमनिहाय शुल्करचना, विषयनिहाय शिक्षकांची माहिती, विविध उपक्रमांचे वेळापत्रक, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थीकेंद्रित सुविधा, संस्थेत झालेले संशोधन, संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेली प्लेसमेंट, विविध संस्थांकडून मिळालेल्या मान्यता, विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तयार करण्यात आलेली सुविधा, संस्थेत उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या, संस्थेला मिळालेले मानांकन अशी विविध माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती संकेतस्थळावर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना होणारी फसवणूक टळणार आहे.