शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आगामी नाट्यसंमेलन ‘नागपूर’ला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:20 IST

पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते.

- नम्रता फडणीस पुणे : आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे. परंतु लातूरमधील दुष्काळाची स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी यांच्या ‘नागपूर’लाच संंमेलन होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे ‘नागपूर’ वरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षीपासून शासनाने नाट्यसंमेलनासाठीदेखील ५० लाख रुपयांची तरतूद केल्यामुळे अनेक इच्छुक संस्था व शाखा आयोजनासाठी पुढे सरसावल्या. राज्यभरातून संंमेलनाच्या आयोजनासाठी तब्बल नऊ निमंत्रणे आल्याने नाट्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या स्थळांची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली. परंतु स्थळांचा दौरा करण्यापूर्वीच सात संस्था आणि शाखांनी आपले प्रस्ताव मागे घेतले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आगामी वर्षात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार असल्याने कदाचित आयोजनापुढे अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो, अशी शक्यता वाटल्याने इच्छुक संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतले असावेत, असा अंदाज आहे. लातूरकर आणि नागपूरकर दोघांनाही संमेलन आयोजिण्याची इच्छा आहे. मात्र लातूरमधील दुष्काळाच्या परिस्थितीचाही विचार करावा लागणार आहे. संमेलनाचा दर्जा आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. ‘नागपूर’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी दोघांचीही मायभूमी असल्याने निवडणुकीच्या काळातही या ठिकाणी संमेलन उत्तम प्रकारे होऊ शकते, असे वाटते. त्यामुळे हेच स्थळ आयोजनासाठी अधिक सोयीचे आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत लातूर किंवा नागपूर या दोन स्थळांपैकी एकावर शिक्कामोर्तब केले जाईल, तसेच एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने नाट्यसंमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार डॉ. प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्यानंतर हे संंमेलन कुठे आणि कधी होणार, याकडे समस्त नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या डामडौल आणि भव्यतेमुळे काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या नाट्यसंमेलनाला चांगले दिवस आल्याची चर्चा ऐकायला मिळाली.