शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

....अन् उलगडले खगोलशास्त्रज्ञाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:16 IST

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार ...

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मराठीत सोप्या भाषेमध्ये वाचनीय कथा लिहिणारा लेखक, विज्ञानवादी असूनही प्राचीन ग्रंथांकडे तर्कशुद्ध विचारसरणीतून पाहाणारा तत्त्वज्ञ आणि प्रश्न विचारण्याची जिज्ञासा मुलींमध्ये उत्पन्न करणारा कुटुंबातला ‘पिता’ अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे मंगळवारी (दि. १६) उलगडली.

डॉ. नारळीकरांच्या लेखनाने मराठी साहित्यात विज्ञानविषयक लेखनाचे दालन तयार झाले आहे. त्यांच्या लेखनाविषयी, जगण्याविषयी दिलखुलास गप्पांचा एक खास ऑनलाइन कार्यक्रम आय-ट्रान्सफॉर्म या संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात गणितज्ज्ञ-लेखिका मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक सुबोध जावडेकर आणि लीलावती नारळीकर सहभागी झाले होते. वसुंधरा काशीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, मराठी लोकांची ही खंत होती की विज्ञानाची साहित्यात दखल घेतली जात नाही. मात्र, डॉ. जयंत नारळीकर यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीने ती आता दूर झाली आहे. दिलीप माजगावकर यांनी लेखक आणि प्रकाशक या नात्याने डॉ. नारळीकर यांच्या समवेतचा २५ वर्षांचा प्रवास सांगितला. डॉ. नारळीकर पाळत असलेली वेळ आणि त्यांची ‘कमिटमेंट’ हे त्यांचे गुण विशेष भावतात, असे ते म्हणाले.

राजहंस प्रकाशनाच्या वतीने डॉ. नारळीकर यांच्या विज्ञान कथा एका खंडात आणि कादंबऱ्या एका खंडात मांडायची मूळ योजना होती. मात्र, कोरोनामुळे काम लांबणीवर पडले. लवकरच त्यांच्या अप्रकाशित विज्ञान कथा आणणार आहोत. भविष्यात त्यांच्या समग्र विज्ञान कथांचा खंड करण्याचा विचार असल्याचे माजगावकर म्हणाले.

डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या की, आमच्यात टोकाचे मतभेद होतात, पण ते आम्ही संवादाने सोडवतो. ज्याचे म्हणणे अधिक तर्कशुद्ध असेल ते आम्ही मान्य करतो. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालताना ‘भगवदगीते’विषयी डॉ. नारळीकर म्हणाले, “भगवदगीता हा मला वाचनीय ग्रंथ वाटतो. परंतु प्रश्न असा आहे की, त्यातील तत्त्वज्ञान तुम्हाला पटते का? त्यातील निष्काम कर्मयोग भावतो. सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करा. जे काम कराल ते पूर्ण मेहनतीने करा म्हणजे कामाचे समाधान मिळेल. डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, “धर्मग्रंथात दिलेला सल्ला सार्वकालीन असतोच असे नाही. त्यातही न पटणाऱ्या गोष्टी आहेत. सामाजिक मूल्य आणि नियम बदलत राहतात. ग्रंथांचा विचार करताना विवेक बाळगला पाहिजे.”