शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

....अन् उलगडले खगोलशास्त्रज्ञाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:16 IST

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार ...

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मराठीत सोप्या भाषेमध्ये वाचनीय कथा लिहिणारा लेखक, विज्ञानवादी असूनही प्राचीन ग्रंथांकडे तर्कशुद्ध विचारसरणीतून पाहाणारा तत्त्वज्ञ आणि प्रश्न विचारण्याची जिज्ञासा मुलींमध्ये उत्पन्न करणारा कुटुंबातला ‘पिता’ अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे मंगळवारी (दि. १६) उलगडली.

डॉ. नारळीकरांच्या लेखनाने मराठी साहित्यात विज्ञानविषयक लेखनाचे दालन तयार झाले आहे. त्यांच्या लेखनाविषयी, जगण्याविषयी दिलखुलास गप्पांचा एक खास ऑनलाइन कार्यक्रम आय-ट्रान्सफॉर्म या संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात गणितज्ज्ञ-लेखिका मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक सुबोध जावडेकर आणि लीलावती नारळीकर सहभागी झाले होते. वसुंधरा काशीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, मराठी लोकांची ही खंत होती की विज्ञानाची साहित्यात दखल घेतली जात नाही. मात्र, डॉ. जयंत नारळीकर यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीने ती आता दूर झाली आहे. दिलीप माजगावकर यांनी लेखक आणि प्रकाशक या नात्याने डॉ. नारळीकर यांच्या समवेतचा २५ वर्षांचा प्रवास सांगितला. डॉ. नारळीकर पाळत असलेली वेळ आणि त्यांची ‘कमिटमेंट’ हे त्यांचे गुण विशेष भावतात, असे ते म्हणाले.

राजहंस प्रकाशनाच्या वतीने डॉ. नारळीकर यांच्या विज्ञान कथा एका खंडात आणि कादंबऱ्या एका खंडात मांडायची मूळ योजना होती. मात्र, कोरोनामुळे काम लांबणीवर पडले. लवकरच त्यांच्या अप्रकाशित विज्ञान कथा आणणार आहोत. भविष्यात त्यांच्या समग्र विज्ञान कथांचा खंड करण्याचा विचार असल्याचे माजगावकर म्हणाले.

डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या की, आमच्यात टोकाचे मतभेद होतात, पण ते आम्ही संवादाने सोडवतो. ज्याचे म्हणणे अधिक तर्कशुद्ध असेल ते आम्ही मान्य करतो. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालताना ‘भगवदगीते’विषयी डॉ. नारळीकर म्हणाले, “भगवदगीता हा मला वाचनीय ग्रंथ वाटतो. परंतु प्रश्न असा आहे की, त्यातील तत्त्वज्ञान तुम्हाला पटते का? त्यातील निष्काम कर्मयोग भावतो. सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करा. जे काम कराल ते पूर्ण मेहनतीने करा म्हणजे कामाचे समाधान मिळेल. डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, “धर्मग्रंथात दिलेला सल्ला सार्वकालीन असतोच असे नाही. त्यातही न पटणाऱ्या गोष्टी आहेत. सामाजिक मूल्य आणि नियम बदलत राहतात. ग्रंथांचा विचार करताना विवेक बाळगला पाहिजे.”