शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

स्वत:च्या कंपनीकडून परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणा-या परीक्षा नियोजित कालावधीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणा-या परीक्षा नियोजित कालावधीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे परीक्षा केव्हा घ्याव्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक घ्यावी, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून स्वत:च्या कंपन्यांकडून परीक्षा घेणे शक्य आहे का? याबाबत चाचपणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा १५ मार्चपासून घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच जुन्या एजन्सीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार परीक्षा विभागाने सुद्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र, नवीन एजन्सी निवडून परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

-----------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येत्या १० मार्च रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये परीक्षेसंदर्भात सर्व धोरणात्मकबाबींवर अंतिम निर्णय होईल, असा मला विश्वास वाटतो.

- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-----------------

विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र, नियोजित कालावधीत परीक्षा घेणे शक्य नसल्यास पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक घेऊन परीक्षांच्या सुधारीत वेळापत्रकावर चर्चा करावी.

- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------------------------

...तर विद्यापीठाचा खर्च वाचणार

जुन्या कंपनीकडून विद्यापीठाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने स्थापन केलेल्या कंपन्यांच्या मदतीने परीक्षा घेता येऊ शकतात का? याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेता आल्या तर विद्यापीठाचा खर्च वाचणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.

---------------------