शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अखेर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 04:24 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते. अखेर हा निर्णय मागे घेत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या खर्चाला मंजुरी देत पूर्ववत विद्यावेतन सुरू केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र अचानक निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे.विद्यार्थी संघटना, सिनेट सदस्य यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे अतिरिक्त भत्ते, सुशोभीकरणावर होणारी उधळपट्टी याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून संशोधक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न लावून धरला होता.नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्टÑवादी विद्यार्थी काँगे्रस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा) व इतर विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थीहिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८ पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला.मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून केल्या जाणाºया अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच. डी. व एमफिलच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे यांनी दिले होते.विद्यावेतन अदा करण्याची अशी असेल कार्यपद्धती...विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. दर सहा महिन्यांना विद्यार्थ्यांना प्रगती अहवाल सादर करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रगती अहवाल विद्याशाखानिहाय गठित केलेल्या समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत.त्यांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर दर ६ महिन्यांनी सेमिनार आयोजिण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करणे बंधनकारक राहील, असे विद्यापीठाने काढलेल्या परित्रकामध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या