शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

अखेर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 04:24 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते. अखेर हा निर्णय मागे घेत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या खर्चाला मंजुरी देत पूर्ववत विद्यावेतन सुरू केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र अचानक निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे.विद्यार्थी संघटना, सिनेट सदस्य यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे अतिरिक्त भत्ते, सुशोभीकरणावर होणारी उधळपट्टी याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून संशोधक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न लावून धरला होता.नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्टÑवादी विद्यार्थी काँगे्रस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा) व इतर विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थीहिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८ पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला.मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून केल्या जाणाºया अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच. डी. व एमफिलच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे यांनी दिले होते.विद्यावेतन अदा करण्याची अशी असेल कार्यपद्धती...विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. दर सहा महिन्यांना विद्यार्थ्यांना प्रगती अहवाल सादर करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रगती अहवाल विद्याशाखानिहाय गठित केलेल्या समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत.त्यांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर दर ६ महिन्यांनी सेमिनार आयोजिण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करणे बंधनकारक राहील, असे विद्यापीठाने काढलेल्या परित्रकामध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या