शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 04:24 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी व एमफिलच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन एप्रिल २०१८ पासून अचानक बंद करण्यात आले होते. अखेर हा निर्णय मागे घेत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या खर्चाला मंजुरी देत पूर्ववत विद्यावेतन सुरू केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र अचानक निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे.विद्यार्थी संघटना, सिनेट सदस्य यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे अतिरिक्त भत्ते, सुशोभीकरणावर होणारी उधळपट्टी याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून संशोधक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न लावून धरला होता.नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्टÑवादी विद्यार्थी काँगे्रस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा) व इतर विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थीहिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८ पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला.मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून केल्या जाणाºया अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच. डी. व एमफिलच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे यांनी दिले होते.विद्यावेतन अदा करण्याची अशी असेल कार्यपद्धती...विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. दर सहा महिन्यांना विद्यार्थ्यांना प्रगती अहवाल सादर करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रगती अहवाल विद्याशाखानिहाय गठित केलेल्या समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत.त्यांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर दर ६ महिन्यांनी सेमिनार आयोजिण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करणे बंधनकारक राहील, असे विद्यापीठाने काढलेल्या परित्रकामध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या