शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:26 IST

नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर त्यापैकी एका प्रश्नपत्रिकेची निवड करावी, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्यामुळे वेळ, कागद, परिणामकारकता वाढत असली तरी त्याचे धोके लक्षात घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, परीक्षा हा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास कोण्या एकाला जबाबदार धरता येणार नाही. परीक्षा आणि निकाल यावर विद्यापीठाची ९० टक्के विश्वासार्हता अवलंबून आहे. त्यामुळे पेपरफुटीसारखे प्रकार घडल्याचे उजेडात आल्यास त्याबाबत कठोर कारवाई केली पाहिजे. परीक्षा योग्य पद्धतीने पार पडाव्यात याकडे विद्यापीठ प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे.तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा वेळ, कागद, कामाची परिणामकारकता वाढत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे धोकेही लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासासाठी तांत्रिक तसेच इतर अनेक उपाययोजना केल्या तरी त्या भेदण्याचा प्रयत्न सातत्याने होणारच आहे. त्यामुळे त्यावर ठोस मार्ग शोधून काढणे आवश्यक आहे.विद्यापीठाकडून महाविद्यालयांना परीक्षेच्या काही वेळ अगोदर प्रश्नपत्रिका पाठविली जाते. काही त्रुटी राहून ती प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाच विषयाच्या ३ प्रश्नपत्रिकांचा सेट महाविद्यालयांना पाठवावा. या ३ प्रश्नपत्रिकांपैकी कोणती प्रश्नपत्रिका वापरायची याचा मेसेज परीक्षेच्या काही वेळ अगोदर संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवावा. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना परीक्षेच्या किती वेळ अगोदर पाठवायची याची वेळ निश्चित करावी. त्यामुळे जरी तिन्ही प्रश्नपत्रिका फुटल्या तरी त्यापैकी नेमकी कुठली प्रश्नपत्रिका वापरली जाणार आहे, हे निश्चित नसल्याने संबंधितांचा प्रयत्न अपयशी ठरू शकेल. परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.विद्यापीठ अनुदान आयोग तसेच नॅकच्या निकषांनुसार मूल्यांकनाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पद्धतीची विश्वासार्र्हता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर देण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालय स्तरांवरून प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वी वारंवार घडले आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्याची जबाबदारी प्राचार्यांवर निश्चित करणे आवश्यक आहे. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे, त्याच्या प्रिंटआऊट काढून परीक्षा पार पडेपर्यंत प्राचार्यांनी त्याकडे स्वत: लक्ष दिले पाहिजे. प्रश्नपत्रिका प्राप्त होऊन परीक्षा सुरळीत पार पडली याबाबत त्या त्या दिवशी विद्यापीठाकडे रिपोर्टिंग झाले पाहिजे. त्यामध्ये काही अडचण आली असल्यास त्याबाबतही त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली जावी. यामुळे प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल. त्याचबरोबर पेपर फुटीचे प्रकार नेमका कुठून घडला याचा शोध घेणे सहज शक्य होऊ शकेल.महाविद्यालयांनी परीक्षांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी इतर कोणत्याही सबबी सांगता कामा नये. तंत्रज्ञानामुळे विद्यापीठाचा व्याप कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे बदल हे महाविद्यालयांनी स्वीकारले पाहिजेत.संकेतस्थळ, ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या व त्यासोशल मीडियावरून व्हायरल होण्याचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने सायबर, प्रशासन यातील तज्ज्ञ व्यक्तींची एक समिती नेमावी. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला सल्ला देण्यासाठीएका समितीची स्थापना विद्यापीठाने करावी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPune universityपुणे विद्यापीठ