शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

साखर उद्योगासाठी केंद्रीय अर्थसंकल्प आशादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्यामुळे या उद्योगाच्या बळकटीकरणास मदत होईल, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्यामुळे या उद्योगाच्या बळकटीकरणास मदत होईल, असे मत राष्ट्रीय साखर महासंघाने व्यक्त केले आहे. राज्य साखर संघाने मात्र काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली असून, त्यासंबंधी केंद्र सरकार त्वरित निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की एकूण साखर उद्योगासाठी ४१५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इथेनॉलच्या देशातंर्गत उत्पादनात वाढ करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे डीनेचर्ड इथेनॉलच्या आयातीवरील सीमाशुल्कात वाढ केली आहे. त्यातून ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढेल आणि इंधन तेलाच्या आयातीचा खर्च वाचणार आहे.

साखर उद्योगासाठी याआधीच्या अर्थसंकल्पात केवळ १२७० कोटी रुपये तरतूद होती. यंदा ती ४ हजार १५० कोटी रुपये आहे. निर्यातीलाही प्रोत्साहन दिले आहे. यातून निर्यातीचे प्रमाण वाढेल व देशातील साखरेचा सध्या असलेला अतिरिक्त साठा कमी होईल, असे मत नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा याबरोबरच १७ प्रमुख साखर उत्पादक राज्यांमधील जवळपास ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना तर त्याचा फायदा होईलच. शिवाय या उद्योगांवर अवलंबून असलेले ५ कोटी नागरिकांनाही त्यामुळे दिलासा मिळेल, असे नाईकनवरे म्हणाले.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी काही मुद्द्यांबाबत नाराजी व्यक्त केली. साखरेच्या किमान विक्री मूल्याबाबत अजूनही निर्णय नाही. उसाला जाहीर केलेल्या योग्य व फायदेशीर किमतीनंतर (एफआरपी) किमान विक्री मूल्य आपोआप वाढले पाहिजे. याबाबतच्या निर्णयाकडे देशातील ५३५ साखर कारखाने, पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत, असे दांडेगावकर म्हणाले.