शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगासाठी केंद्रीय अर्थसंकल्प आशादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्यामुळे या उद्योगाच्या बळकटीकरणास मदत होईल, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्यामुळे या उद्योगाच्या बळकटीकरणास मदत होईल, असे मत राष्ट्रीय साखर महासंघाने व्यक्त केले आहे. राज्य साखर संघाने मात्र काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली असून, त्यासंबंधी केंद्र सरकार त्वरित निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की एकूण साखर उद्योगासाठी ४१५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इथेनॉलच्या देशातंर्गत उत्पादनात वाढ करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे डीनेचर्ड इथेनॉलच्या आयातीवरील सीमाशुल्कात वाढ केली आहे. त्यातून ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढेल आणि इंधन तेलाच्या आयातीचा खर्च वाचणार आहे.

साखर उद्योगासाठी याआधीच्या अर्थसंकल्पात केवळ १२७० कोटी रुपये तरतूद होती. यंदा ती ४ हजार १५० कोटी रुपये आहे. निर्यातीलाही प्रोत्साहन दिले आहे. यातून निर्यातीचे प्रमाण वाढेल व देशातील साखरेचा सध्या असलेला अतिरिक्त साठा कमी होईल, असे मत नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा याबरोबरच १७ प्रमुख साखर उत्पादक राज्यांमधील जवळपास ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना तर त्याचा फायदा होईलच. शिवाय या उद्योगांवर अवलंबून असलेले ५ कोटी नागरिकांनाही त्यामुळे दिलासा मिळेल, असे नाईकनवरे म्हणाले.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी काही मुद्द्यांबाबत नाराजी व्यक्त केली. साखरेच्या किमान विक्री मूल्याबाबत अजूनही निर्णय नाही. उसाला जाहीर केलेल्या योग्य व फायदेशीर किमतीनंतर (एफआरपी) किमान विक्री मूल्य आपोआप वाढले पाहिजे. याबाबतच्या निर्णयाकडे देशातील ५३५ साखर कारखाने, पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत, असे दांडेगावकर म्हणाले.