शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्यभरात सुरू आहे अघोषित भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:37 IST

ग्रामीण भागामध्ये चार-पाच तास वीज गायब

श्रीकिशन काळे 

पुणे : राज्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कृषिपंपांना पहाटे चार वाजता वीज उपलब्ध करून दिली जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

ग्रामीण भागात तर १२ तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा नसतो. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात ४ ते ५ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. पुणे शहरात गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी काही भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ बंद राहील, असे निवेदन वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु, अनेक भागांतील वीज सकाळी ७ वाजताच खंडित करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंतदेखील वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. ग्रामीण भागांत २४ तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी सिंगल फेज वीजवितरण व्यवस्थेचेजाळे बदलून थ्री फेज लाईनने जोडण्यात आले आहे. यासाठी कृषी वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या. १२ दिवस गावात अंधारबीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा नियमित नाही. आडस (ता. केज, जि. बीड) या गावात तर गेल्या १२ दिवसांपासून वीजच नाही. गावातील एक डीपी उडाल्यामुळे १२ दिवस विजेविना ग्रामस्थांना राहावे लागत आहे. डीपी आणायला गाडी नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांकडून प्रत्येकी ५० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर डीपी आणला; परंतु एका दिवसातच तो उडाला.

टॅग्स :Puneपुणे