शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राज्यभरात सुरू आहे अघोषित भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:37 IST

ग्रामीण भागामध्ये चार-पाच तास वीज गायब

श्रीकिशन काळे 

पुणे : राज्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कृषिपंपांना पहाटे चार वाजता वीज उपलब्ध करून दिली जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

ग्रामीण भागात तर १२ तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा नसतो. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात ४ ते ५ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. पुणे शहरात गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी काही भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ बंद राहील, असे निवेदन वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु, अनेक भागांतील वीज सकाळी ७ वाजताच खंडित करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंतदेखील वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. ग्रामीण भागांत २४ तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी सिंगल फेज वीजवितरण व्यवस्थेचेजाळे बदलून थ्री फेज लाईनने जोडण्यात आले आहे. यासाठी कृषी वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या. १२ दिवस गावात अंधारबीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा नियमित नाही. आडस (ता. केज, जि. बीड) या गावात तर गेल्या १२ दिवसांपासून वीजच नाही. गावातील एक डीपी उडाल्यामुळे १२ दिवस विजेविना ग्रामस्थांना राहावे लागत आहे. डीपी आणायला गाडी नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांकडून प्रत्येकी ५० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर डीपी आणला; परंतु एका दिवसातच तो उडाला.

टॅग्स :Puneपुणे