शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

देशात अघोषित आणीबाणी

By admin | Updated: May 27, 2017 02:33 IST

भारतीय जनता पार्टीने देशात अघोषित आणीबाणी लागू केली असून, सरकारविरोधात भाष्य करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय जनता पार्टीने देशात अघोषित आणीबाणी लागू केली असून, सरकारविरोधात भाष्य करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपा सरकारच्या तीन वर्षपूूर्तीची ‘पोलखोल’ करण्यासाठी मुंबई काँग्रेसने आझाद मैदानात आयोजित केलेल्या निदर्शनांदरम्यान ते बोलत होते. या वेळी मुस्लीम आणि दलितांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचे चित्रप्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले होते.चव्हाण म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्या नेत्यांची धरपकड करत, सुरक्षायंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. लालूप्रसाद यादव, पी. चिदंबरम आणि अनेक नेत्यांच्या विरोधात कारस्थान रचून सरकार विरोधकांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा धडपशाहीला काँग्रेस घाबरणार नाही. काही पराभवांनी खचून न जाता कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात एकजुटीने संघर्ष करावा. भाजपाला देशाबाहेर काढायची प्रतिज्ञा चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.भाजपाच्या केंद्रातील सरकारने तीन वर्षांत केवळ दलित आणि मुस्लिमांवर हल्ले केले, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. निरूपम म्हणाले की, शेतकरी, सैनिक, युवक सर्वच घटक केंद्र सरकारच्या कामामुळे निराश आहेत. सैनिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही. नोटाबंदीनंतर अनेक कंपन्यांनी कामगार कपात केल्याने मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे गोरक्षाच्या नावाखाली देशात मुस्लीम आणि दलितांवरील हल्ले दिवसांगणिक वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. ही सर्व परिस्थिती चित्रांच्या माध्यमातून आझाद मैदानात मांडत निरूपम यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेतले.