शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:17 IST

मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे.

बारामती : मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांची ऐसीतैशी करीत बेलगाम वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. याबाबत प्रशासनच ढीम्म असून वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे बारामतीकरांवर ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे.बारामती शहरासह लगतचा भाग, तसेच तालुक्यातील मोठ्या गावांच्या विकासाची गती वाढली आहे. शहराकडे येण्याचा लोकांचा ओढा वेगाने वाढत चालला आहे. परिणामी, शहरातील वाहनांच्या संख्येतही भर पडत चालली आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१२-१३ पर्यंत एकूण २ लाख ३२ हजार २९ वाहनांची नोंदणी झाली होती. मागील पाच वर्षांत त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये या वाहनसंख्येत जवळपास दीड लाख वाहनांची भर पडली आहे. हा आकडा बारामतीसह दौंड व इंदापूर तालुक्यातील वाहनांचा असला तरी बारामती तालुक्यातील वाहनांची संख्या तुलनेने अधिक आहे.एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरुंदच राहिले. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी अनेकदा तात्कालिक उपाययोजना करण्यात आल्या. नगरपालिका, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागासह अन्य संबंधित विभागांकडून त्यावर ठोस उपाय न करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. भविष्यात ही समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.>डबल पार्किंगचे ग्रहणमहावीर पथ, स्टेशन रोड, सिनेमा रोड, गुणवडी चौक ते बसस्थानकापर्यंत या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक रस्त्यांना डबल पार्किंगचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. बहुतेक रस्त्यांलगत दुचाकी उभ्या करतात.त्यांच्यामागे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत आहे.>आरटीओकडील गेल्या तीन वर्षांतील वाहन नोंदणी२०१५-१६२३७८११७८४०२५७४२०१६-१७ २३६६५ १७६३१ ३२१७२०१७-१८ ३२६६७ २४२४८ ३९२५>उपाययोजना शून्यसुरळीत वाहतुकीसाठी काही चौकांमध्ये काही वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. पण सध्या ते बंद आहेत. गर्दीच्यावेळी नियमनासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते. पण वाहनचालक त्यांनाही जुमानत नाहीत.नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. रस्त्याच्याकडेला पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. सर्वच रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले.ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन घुसविणे असे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळाले. अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नाही.>नियमांचे उल्लंघनमहावीर पथ व स्टेशन रस्ता एकत्र येत असलेल्या चौकातून दोन्ही रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. पण वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटली जात असल्याचे पाहायला मिळाले. या चौकात काही वेळा पोलीसही असतात. पण त्यांनाही जुमानले जात नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या हे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूककोंडी नेहमीचीच झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे