शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:17 IST

मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे.

बारामती : मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांची ऐसीतैशी करीत बेलगाम वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. याबाबत प्रशासनच ढीम्म असून वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे बारामतीकरांवर ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे.बारामती शहरासह लगतचा भाग, तसेच तालुक्यातील मोठ्या गावांच्या विकासाची गती वाढली आहे. शहराकडे येण्याचा लोकांचा ओढा वेगाने वाढत चालला आहे. परिणामी, शहरातील वाहनांच्या संख्येतही भर पडत चालली आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१२-१३ पर्यंत एकूण २ लाख ३२ हजार २९ वाहनांची नोंदणी झाली होती. मागील पाच वर्षांत त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये या वाहनसंख्येत जवळपास दीड लाख वाहनांची भर पडली आहे. हा आकडा बारामतीसह दौंड व इंदापूर तालुक्यातील वाहनांचा असला तरी बारामती तालुक्यातील वाहनांची संख्या तुलनेने अधिक आहे.एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरुंदच राहिले. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी अनेकदा तात्कालिक उपाययोजना करण्यात आल्या. नगरपालिका, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागासह अन्य संबंधित विभागांकडून त्यावर ठोस उपाय न करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. भविष्यात ही समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.>डबल पार्किंगचे ग्रहणमहावीर पथ, स्टेशन रोड, सिनेमा रोड, गुणवडी चौक ते बसस्थानकापर्यंत या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक रस्त्यांना डबल पार्किंगचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. बहुतेक रस्त्यांलगत दुचाकी उभ्या करतात.त्यांच्यामागे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत आहे.>आरटीओकडील गेल्या तीन वर्षांतील वाहन नोंदणी२०१५-१६२३७८११७८४०२५७४२०१६-१७ २३६६५ १७६३१ ३२१७२०१७-१८ ३२६६७ २४२४८ ३९२५>उपाययोजना शून्यसुरळीत वाहतुकीसाठी काही चौकांमध्ये काही वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. पण सध्या ते बंद आहेत. गर्दीच्यावेळी नियमनासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते. पण वाहनचालक त्यांनाही जुमानत नाहीत.नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. रस्त्याच्याकडेला पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. सर्वच रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले.ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन घुसविणे असे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळाले. अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नाही.>नियमांचे उल्लंघनमहावीर पथ व स्टेशन रस्ता एकत्र येत असलेल्या चौकातून दोन्ही रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. पण वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटली जात असल्याचे पाहायला मिळाले. या चौकात काही वेळा पोलीसही असतात. पण त्यांनाही जुमानले जात नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या हे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूककोंडी नेहमीचीच झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे