शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

पाणी सोडण्यावर अनिश्चितता

By admin | Updated: September 24, 2015 03:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी मुळा-मुठा नदीत पाणी सोडावे

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी मुळा-मुठा नदीत पाणी सोडावे किंवा नाही, याबाबत तत्काळ सुस्पष्ट अहवाल देण्याच्या सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे महापालिकेला दिल्या आहेत.राव यांनी सांगितले, ‘‘यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. धरणांच्या साठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. पाण्याची गंभीर टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढला आहे. आगामी पावसाळी हंगामापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही धरणांमधून प्रामुख्याने खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून राहणार आहे. याबाबत विसर्जनासाठी मुळा-मुठेत पाणी सोडण्याबाबत दबाव वाढत आहे. यामुळे पाणी सोडण्यासंदर्भात महापालिकेकडून अहवाल मागविला आहे.’’