शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Rahul Gandhi | "त्वरीत अपात्रतेचा निर्णय घटनेला धरून मात्र त्यात राजकारण अधिक"

By राजू इनामदार | Updated: March 24, 2023 19:12 IST

त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले...

पुणे : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना सूरत न्यायालयात २ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय त्वरीत घेतला तो राज्यघटनेला धरूनच आहे, मात्र त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

देशभरात राहूल यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केल्याची चर्चा आहे. सूरत न्यायालयाने त्यांना एका गुन्ह्यात २ वर्षांची शिक्षा दिल्यानंतर सचिवालयाने त्वरीत हा निर्णय घेतल्यासंदर्भात“लोकमत’ बरोबर बोलताना बापट यांनी सांगितले की सचिवालयाचा हा निर्णय राज्यघटनेला धरूनच आहे. आता राहूल गांधी न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तरच त्यांचे संसद सदस्यत्व राहू शकते. मात्र हा निर्णय घटनेला धरून असला तरी त्यात कायदेशीर बाबींपेक्षाही राजकीय दबाव जास्त आहे.

तो कसा? असा प्रश्न केल्यावर डॉ. बापट म्हणाले, “राजकारणाविषयी मला काहीही बोलायचे नाही. मात्र राज्यघटनेतील काही तरतुदी सांगता येतील. घटनेच्या १०२ व्या कलमात अपात्रतेविषयीची तरतुद आहे. त्यात दिवाळखोर, मानसिक दृष्ट्या कमजोर, अन्नधान्य भेसळ, अंमलीपदार्थ वाहतूक अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यात २ वर्षांची शिक्षा झाली असेल तर अपात्र होईल. त्यातच पुढे त्याने अपील केले असेल तर त्याचा निकाल लागेपर्यंत अपात्र करता येणार नाही अशी तरतुद होती. ती घटनाबाह्य असल्याचा विचार पुढे आल्याने ती काढून टाकण्यात आली.”

मात्र पुढच्याच म्हणजे १०३ व्या कलमात संसद सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय राष्ट्रपती घेतील व त्याआधी ते मुख्य निवडणूक आयुक्तांसमवेत चर्चा करतील असे आहे. राहूल गांधी प्रकरणात हे झालेले दिसत नाही. बदनामीच्या प्रकरणात (कलम ४९९) जास्तीजास्त शिक्षा २ वर्षांची असेल असे नमुद आहे. जास्तीतजास्त शिक्षा ही प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन सुनावली जाते. या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली गेली, कारण ती २ वर्षांची असेल तरच अपात्र करता येते असे स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. बापट यांनी सांगितले.

राजकारण किंवा राजकीय व्यक्तींविषयी काहीच बोलायचे नाही, पण या प्रकरणात दबाव असल्याचे प्रकरणाच्या अभ्यासावरून ठळकपणे दिसते आहे. भारतीय जनता न पटणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबाबत जाहीरपणे किंवा सामुहिकपणे काहीच बोलत नाही, मात्र ती सुज्ञ आहे असे विश्वास डॉ. बापट यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा