शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

Rahul Gandhi | "त्वरीत अपात्रतेचा निर्णय घटनेला धरून मात्र त्यात राजकारण अधिक"

By राजू इनामदार | Updated: March 24, 2023 19:12 IST

त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले...

पुणे : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना सूरत न्यायालयात २ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय त्वरीत घेतला तो राज्यघटनेला धरूनच आहे, मात्र त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

देशभरात राहूल यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केल्याची चर्चा आहे. सूरत न्यायालयाने त्यांना एका गुन्ह्यात २ वर्षांची शिक्षा दिल्यानंतर सचिवालयाने त्वरीत हा निर्णय घेतल्यासंदर्भात“लोकमत’ बरोबर बोलताना बापट यांनी सांगितले की सचिवालयाचा हा निर्णय राज्यघटनेला धरूनच आहे. आता राहूल गांधी न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तरच त्यांचे संसद सदस्यत्व राहू शकते. मात्र हा निर्णय घटनेला धरून असला तरी त्यात कायदेशीर बाबींपेक्षाही राजकीय दबाव जास्त आहे.

तो कसा? असा प्रश्न केल्यावर डॉ. बापट म्हणाले, “राजकारणाविषयी मला काहीही बोलायचे नाही. मात्र राज्यघटनेतील काही तरतुदी सांगता येतील. घटनेच्या १०२ व्या कलमात अपात्रतेविषयीची तरतुद आहे. त्यात दिवाळखोर, मानसिक दृष्ट्या कमजोर, अन्नधान्य भेसळ, अंमलीपदार्थ वाहतूक अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यात २ वर्षांची शिक्षा झाली असेल तर अपात्र होईल. त्यातच पुढे त्याने अपील केले असेल तर त्याचा निकाल लागेपर्यंत अपात्र करता येणार नाही अशी तरतुद होती. ती घटनाबाह्य असल्याचा विचार पुढे आल्याने ती काढून टाकण्यात आली.”

मात्र पुढच्याच म्हणजे १०३ व्या कलमात संसद सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय राष्ट्रपती घेतील व त्याआधी ते मुख्य निवडणूक आयुक्तांसमवेत चर्चा करतील असे आहे. राहूल गांधी प्रकरणात हे झालेले दिसत नाही. बदनामीच्या प्रकरणात (कलम ४९९) जास्तीजास्त शिक्षा २ वर्षांची असेल असे नमुद आहे. जास्तीतजास्त शिक्षा ही प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन सुनावली जाते. या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली गेली, कारण ती २ वर्षांची असेल तरच अपात्र करता येते असे स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. बापट यांनी सांगितले.

राजकारण किंवा राजकीय व्यक्तींविषयी काहीच बोलायचे नाही, पण या प्रकरणात दबाव असल्याचे प्रकरणाच्या अभ्यासावरून ठळकपणे दिसते आहे. भारतीय जनता न पटणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबाबत जाहीरपणे किंवा सामुहिकपणे काहीच बोलत नाही, मात्र ती सुज्ञ आहे असे विश्वास डॉ. बापट यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा