शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

उजनीला हृदयाचा आजार अन् उपचार दाताच्या डॉक्टरकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST

कळस : उजनीच्या जलप्रदूषणाबाबत बारा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. प्रदूषणयुक्त पाणी थांबविण्यासाठी तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. ...

कळस : उजनीच्या जलप्रदूषणाबाबत बारा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. प्रदूषणयुक्त पाणी थांबविण्यासाठी तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, त्यांच्याकडून कामही होत नाही. सरकारने यावरती तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, मात्र उजनीला हृदयाचा आजार झाला असताना दाताच्या डॉक्टरकडून उपचार होत असल्याचा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केला.

शेळगाव (ता. इंदापूर) येथील जलसाक्षरता अभियान शुभारंभप्रसंगी राजेंद्रसिंह यांनी सांगितले.

नद्या स्वच्छ झाल्या तर राज्य समृद्ध होईल, मुळा आणि मुठा या नद्यांमध्ये प्रदूषण होते, हे प्रदूषण अद्यापही कमी झालेले नाही. सरकार या दोन्ही नद्यांच्या बाजूच्या परिसराला हजारो कोटी रुपये खर्च करते. परंतु नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, पाण्याचा बेसुमार वापर व पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे महाराष्ट्रात पाणीबाणी अटळ आहे. सद्य:स्थितीवर भाष्य करताना पाण्याचा वापर वाढला आहे. मात्र जिरायती शेतीचे प्रमाणही जास्त आहे. या परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे. पाणी योग्य पद्धतीने वापरले तरच समतोल साधला जाईल.

यशदाचे उपसंचालक मलिनाथ कल्लशेट्टी यांनी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जलसाक्षरता अभियान गतिमान करता येईल, अनेक योजना प्रभावीपणे राबवून चळवळ अधिक बळकट होईल असे सांगितले. सेवानिवृत्त प्रकल्प संचालक उदय देवळानकर यांनी राज्यातील ऊसशेतीमुळे पाण्याचा मोठा फटका बसत असून पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात भजनदास पवार यांनी कडबनवाडी पाणलोट क्षेत्र व ऑक्सिजन पार्कची माहिती विशद करून पाण्याचे महत्व अधोरेखित केले.

या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय परिट, यशदाचे संचालक सुमित पांडे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास यशदाचे संचालक आनंद पुसावळे, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. लक्ष्मण शिंगाडे, शेळगाव, ग्रामपंचायतीचे सरपंच रामदास शिंगाडे, कडबनवाडीचे सरपंच दादा जाधव, ॲड. अशोक शिंगाडे उपस्थित होते

.........

उजनी जलाशयामधील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येतील यासाठी काय करता येईल? याचा या चळवळीशी संबंध असणाऱ्या तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, तालुक्यात हे अभियान गतीने राबवण्यासाठी सर्व मदत केली जाईल असे सांगितले.

-

दत्तात्रेय भरणे,

सार्वजनिक जलसंधारण राज्यमंत्री