शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

जगण्यासाठी ज्येष्ठाची पाण्यात दोन दिवसांची चिवट लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:50 IST

मालाडचा रहिवासी : सासवड रस्त्यावरील हडपसरच्या कालव्याच्या पुलाखालील घटना

- जयवंत गंधाले 

हडपसर : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पैसे नाहीत म्हणून चार दिवस काम करून कमावणे हा एकच उद्देश. कामासाठी पुण्यात आल्यावर त्याने निवारा शोधला तोदेखील पुणे-सासवड रस्त्यावरील कॅनॉलच्या पुलाखाली. मात्र, अचानक कॅनॉलचे पाणी वाढले आणि गेली तीन दिवस कठड्याचा आधार घेत आपल्याला वाचवण्याची हाक देत राहिला.

ही कहाणी आहे एका ६० वर्षीय गृहस्थाची. जो जीवाच्या आकांताने येणाऱ्या-जाणाºयांना हाक देत होता. अचानक येथील महिलांना ते दिसले आणि त्या महिलांनी बच्चूसिंग यांना सांगितले. त्यांनी व त्यांच्या २ मुलांनी या वृद्धाला बाहेर काढले. एवढ्यावर न थांबता परिवारापर्यंत पोहचवण्याचे कामही या तिघांनी केले.

मालाड येथून सासवड येथे केटरिंगचे काम करण्यासाठी गणपत विश्राम गोरीवले (वय ६०) हे आले. काम झाल्यानंतर केटरिंगमधील मुलांनी त्यांना येथेच सोडून दिले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते पायी हडपसरमध्ये आले. येथील एका हॉटेलमध्ये ते काम करू लागले. काम झाल्यावर मात्र त्यांना राहण्याची समस्या जाणवू लागली. त्यांनी पुणे-सासवड रस्त्यावरील कालव्याच्या पुलाखाली निवारा शोधला. तेथे ते दिवसभर काम करून संध्याकाळी राहत होते. गेले ८ दिवस हा दिनक्रम सुरू होता. मालाडला जाण्यासाठी पैसे जमा झाले होते. उद्या सकाळी जाण्याचे ठरले. त्याच रात्री कॅनॉलमधील पाणी वाढले आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.

रविवारी (दि.१३) रोजी संध्याकाळी या कालव्याला पाणी सोडले होते. तेव्हापासून त्यांना बाहेर येता येत नव्हते. पुलाखालील दगडी कठड्याचा आधार घेऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. आज दुपारी दोनच्या सुमारास स्थानिक महिलांना ते दिसले. गेले २ दिवस पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांची अवस्था फार बिघडली होती. त्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे होते. त्यांना पाहिलेल्या महिलांनी येथील सामाजिक कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांना ही माहिती कळवली. त्यानंतर बच्चूसिंग टाक व त्यांचा मुलगा आझाद सिंग टाक, भगतसिंग टाक यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांचा जीव वाचवला. त्यांना बाहेर काढले. गोरीवले यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा कामानिमित्त इंदापूर येथे असतो तर मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी मालाडला असते. त्यांना सुखरूप बाहेर काढून जेवण दिले. त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला.

शिवाय त्यांना पुणे स्टेशनवरून ट्रेनने मालाडला पोहोचवण्याची व्यवस्था ही केली. बच्चूसिंग यांनी आत्तापर्यंत १२५ लोकांना अश्या धोकादायक अवस्थेतून बाहेर काढले आहे.

त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही!महिला आणि बच्चूसिंग टाक व त्यांच्या मुलांच्या मदतीमुळे मला जीवदान मिळाले. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. घरी जाण्यासाठी पै-पै जमवत होतो. मध्येच असा प्रसंग आल्याने मी घाबरलो होतो. मला कॅनॉलमध्ये पाणी आल्याने बाहेर पडता आले नाही. जाणाºया-येणाºयांना गोणपाट हातात घेऊन मदतीसाठी हाक देत होतो. हे तिघे पोहत आले आणि मला हाताला धरून बाहेर काढले. मला पोहता येत नव्हते.- गणपत विश्राम गोरीवलेआतापयर्यंत जिवंत व पाण्यात मृत अवस्थेत वाहत आलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. अनेक वर्षे ही सेवा मी करत आहे. माझ्या सोबत आता आझादसिंग व भगतसिंग ही माझी दोन्ही मुलेही हे कार्य करत आहेत.

-बच्चूसिंग टाक, सामाजिक कार्यकर्ते