शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आदिवासी भागात दुप्पट वीजबिले

By admin | Updated: April 21, 2015 03:07 IST

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेला दुप्पट वीजबिले येत आहेत.

तळेघर : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेला दुप्पट वीजबिले येत आहेत. ही वीजबिले भरता-भरता आदिवासी जनतेचे कंबरडे मोडले आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये गेले पाच ते सहा महिन्यांपासून वीजबिलांचे रीडिंग अंदाजे घेतले जाते. यामुळे या भागातील जनतेला वीज मीटरवर एक रीडिंग व या आकडेवारीच्या दुप्पट आकडेवारी लावून दुप्पट वीजबिल येते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर या गोष्टी घालूनही या विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बजरंग दलाचे पश्चिम भागातील अध्यक्ष प्रदीप उंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. महिन्याच्या महिन्याला येणाऱ्या बिलामुळे वीजबिलाचे रीडिंग कार्यालयात पोहोचते न पोहोचते तोच बिल ग्राहकाच्या हातात येते. यामुळे या परिसरातील जनतेला नाहक जादा बिल भरावे लागते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये सरसकट सत्तर (७० रुपये) बिल प्रत्येक ग्राहकाला आले आहे. त्याच्या मागे दोन-तीन महिन्यांपूर्वी ९० रुपये प्रत्येकी वीजबिल आले होते. या बिलाची कसर काढून पुढील येणारे बिल तिपटीने दिले जाते. यामुळे महावितरणापुढे आदिवासी जनता हतबल झाली आहे.गलथान कारभार सुधारावा अन्यथा मंचर-भीमाशंकर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रदीप उंडे यांनी सांगितले.(वार्ताहर)