शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:41 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाºया उमेदवारांची संख्या वाढणार आहे.आयोगाने ‘द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन रुल्स आॅफ प्रोसिजर २०१४’ यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार निवडीचा नियम बदलण्यात आला असून, ते राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. पूर्वी एकूण पदांच्या ८ आणि १० पट या निकषानुसार परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जात होते. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निकष मागील वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन बदलानुसार प्रवर्गानुसार प्रत्येक पदासाठी १२ पट परीक्षार्थींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार गुणांचा कटआॅफ निश्चित केला जाणार आहे. एखाद्या प्रवर्गातून १२ पट परीक्षार्थी न मिळाल्यास कट आॅफखाली आणला जाईल. तसेच हे परीक्षार्थी त्या प्रवर्गामधील पदांसाठी पात्र ठरतील. सप्टेंबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याविषयी आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, आयोगाकडून घेतल्या जाणाºया बहुतेक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्याचा विचार होता. नवीन निर्णयानुसारप्रत्यक्षात प्रत्येक पदामागे १५ ते १६ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापूर्वी ८ ते १० परीक्षार्थींची निवड केली जात होती.

टॅग्स :examपरीक्षाGovernmentसरकार