शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:41 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाºया उमेदवारांची संख्या वाढणार आहे.आयोगाने ‘द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन रुल्स आॅफ प्रोसिजर २०१४’ यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार निवडीचा नियम बदलण्यात आला असून, ते राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. पूर्वी एकूण पदांच्या ८ आणि १० पट या निकषानुसार परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जात होते. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निकष मागील वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन बदलानुसार प्रवर्गानुसार प्रत्येक पदासाठी १२ पट परीक्षार्थींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार गुणांचा कटआॅफ निश्चित केला जाणार आहे. एखाद्या प्रवर्गातून १२ पट परीक्षार्थी न मिळाल्यास कट आॅफखाली आणला जाईल. तसेच हे परीक्षार्थी त्या प्रवर्गामधील पदांसाठी पात्र ठरतील. सप्टेंबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याविषयी आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, आयोगाकडून घेतल्या जाणाºया बहुतेक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्याचा विचार होता. नवीन निर्णयानुसारप्रत्यक्षात प्रत्येक पदामागे १५ ते १६ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापूर्वी ८ ते १० परीक्षार्थींची निवड केली जात होती.

टॅग्स :examपरीक्षाGovernmentसरकार