शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

‘तुकडेतुकडे गँग’ ला वेळीच हवी ‘चपराक’ : गोंविददेव गिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:23 IST

पुणे : “सध्या आपल्या देशात विचारांवर आक्रमण सुरू आहे. ‘तुकडेतुकडे गँग’ आणि ‘लुटीयन्स’ लोक आपल्याला लुबाडत असून, समाजाला तोडण्यासाठी ...

पुणे : “सध्या आपल्या देशात विचारांवर आक्रमण सुरू आहे. ‘तुकडेतुकडे गँग’ आणि ‘लुटीयन्स’ लोक आपल्याला लुबाडत असून, समाजाला तोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना वेळीच ‘चपराक’ लावायला हवी. या विचार प्रवृत्तींविरुद्ध प्रत्येकाने प्रतिकार करायला हवा. अशा परिस्थितीत लेखकांनी स्वतःच्या प्रज्ञेला धार चढवली पाहिजे. धार चढवण्यासारखे साहित्य रचले पाहिजे,” असे परखड मत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोंविददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

चपराक प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘नवव्या चपराक साहित्य महोत्सवा’त राज्यभरातील पंधरा लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, प्रकाशक घनश्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, जे लाजवते, माजवते ते साहित्य नसते. जीवनाला सजवणारे साहित्य असते. साहित्यातून लोकांचे दोष आपोआपच दूर होतात आणि जीवनाला उजाळा येतो. साहित्य हे दीर्घकाळ वाचले जावे. आज त्याची फार आवश्यकता आहे. आज सगळे लोक गुळगुळीत झाल्यामुळे देशाला कणाच उरलेला नाही. जेव्हा असा समाज उभा राहतो तेव्हा समाजाला चपराक देणारा ‘चपराक’कार निर्माण होण्याची गरज असते. देश घडवण्याची जबाबदारी लेखकांची आहे. हे करायचे असेल तर सातत्याने लिहिले जावे.

प्रदीप रावत म्हणाले, “साहित्यात संस्कृती घडविण्याची शक्ती असते. वास्तववादी जीवन साहित्यातून चांगल्या प्रकारे कसे येऊ शकेल याचा प्रयत्न केला पाहिजे. साहित्य हे आत्मजीवनाचे प्रतीक न बनता त्यात समाजातील व्यापकता यायला हवी. भारतात उथळपणा खूप आहे. सर्वच क्षेत्रात भोंदूपणा आणि आव आणला जातो. म्हणूनच त्या-त्या क्षेत्रातील लोकांनी त्या ताकदीने काम केले तर जीवनात समृद्धता आणि खोली निर्माण होईल.”