शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:25 IST

एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे - एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे मिलिंद एकबोटे यांचे ज्येष्ठ बंधू व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी स्पष्ट केले.कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी येरवडा कारागृहात कोरेगाव भीमाप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्याशी एका व्यक्तीची गोपनीय भेट घडवून आणल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. ठाणे मध्यवती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी या संदर्भात राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, एकबोटे कुटुंबीयांनी जाधव यांची तक्रार बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा पुरावा आढळत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आमचा भाऊ सरळमार्गी आहे. मीही त्यांना कारागृहात भेटण्यासाठी रांगेत उभे राहून पास काढला. जाळीतून आमची भेट झाली.स्वाती साठे यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांची ओळख असण्याचा प्रश्नच नाही. जाधव हे सेवेतून बडतर्फ असून एका प्रकरणात त्यांनी साठे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या भांडणात आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केली आहे. जे बडतर्फ झाले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यामुळे त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विनाकारण मिलिंद एकबोटे यांना अडकविले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.मिलिंद एकबोटे हे १५ वर्षे नगरसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार गायींचे रक्षण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दैवत आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप लेखही लिहिले आहेत. क्रांतिवीर लहुजी प्रतिष्ठानमार्फत आतापर्यंत त्यांनी ५० हजार दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांचे ८० टक्के कार्यकर्ते दलित आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. - डॉ. गजानन एकबोटे

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेnewsबातम्या