शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:25 IST

एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे - एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे मिलिंद एकबोटे यांचे ज्येष्ठ बंधू व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी स्पष्ट केले.कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी येरवडा कारागृहात कोरेगाव भीमाप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्याशी एका व्यक्तीची गोपनीय भेट घडवून आणल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. ठाणे मध्यवती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी या संदर्भात राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, एकबोटे कुटुंबीयांनी जाधव यांची तक्रार बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा पुरावा आढळत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आमचा भाऊ सरळमार्गी आहे. मीही त्यांना कारागृहात भेटण्यासाठी रांगेत उभे राहून पास काढला. जाळीतून आमची भेट झाली.स्वाती साठे यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांची ओळख असण्याचा प्रश्नच नाही. जाधव हे सेवेतून बडतर्फ असून एका प्रकरणात त्यांनी साठे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या भांडणात आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केली आहे. जे बडतर्फ झाले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यामुळे त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विनाकारण मिलिंद एकबोटे यांना अडकविले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.मिलिंद एकबोटे हे १५ वर्षे नगरसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार गायींचे रक्षण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दैवत आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप लेखही लिहिले आहेत. क्रांतिवीर लहुजी प्रतिष्ठानमार्फत आतापर्यंत त्यांनी ५० हजार दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांचे ८० टक्के कार्यकर्ते दलित आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. - डॉ. गजानन एकबोटे

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेnewsबातम्या