शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:25 IST

एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे - एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे मिलिंद एकबोटे यांचे ज्येष्ठ बंधू व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी स्पष्ट केले.कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी येरवडा कारागृहात कोरेगाव भीमाप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्याशी एका व्यक्तीची गोपनीय भेट घडवून आणल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. ठाणे मध्यवती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी या संदर्भात राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, एकबोटे कुटुंबीयांनी जाधव यांची तक्रार बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा पुरावा आढळत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आमचा भाऊ सरळमार्गी आहे. मीही त्यांना कारागृहात भेटण्यासाठी रांगेत उभे राहून पास काढला. जाळीतून आमची भेट झाली.स्वाती साठे यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांची ओळख असण्याचा प्रश्नच नाही. जाधव हे सेवेतून बडतर्फ असून एका प्रकरणात त्यांनी साठे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या भांडणात आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केली आहे. जे बडतर्फ झाले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यामुळे त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विनाकारण मिलिंद एकबोटे यांना अडकविले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.मिलिंद एकबोटे हे १५ वर्षे नगरसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार गायींचे रक्षण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दैवत आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप लेखही लिहिले आहेत. क्रांतिवीर लहुजी प्रतिष्ठानमार्फत आतापर्यंत त्यांनी ५० हजार दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांचे ८० टक्के कार्यकर्ते दलित आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. - डॉ. गजानन एकबोटे

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेnewsबातम्या