शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारेच खरे साहित्य

By admin | Updated: January 21, 2015 00:40 IST

समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारे लेखन म्हणजे खरे साहित्य असते. प्रत्येक माणूस स्वत:शी बोलत असतो. पारतंत्र्याला पराभूत करण्याची प्रेरणा देणारी माणसंच थोर आहेत,

येरवडा : समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारे लेखन म्हणजे खरे साहित्य असते. प्रत्येक माणूस स्वत:शी बोलत असतो. पारतंत्र्याला पराभूत करण्याची प्रेरणा देणारी माणसंच थोर आहेत, नाहीतर कोणीच स्वतंत्र नाही. समाजात थोर माणसं नसती तर साहित्यकारांनाही सामाजिक साहित्य लिहिता आले नसते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मु. शिंंदे यांनी केले. टिंंगरेनगरमध्ये सुयोग वाचनालयाच्या वतीने आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फ. मु. शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष बापू कर्णे (गुरुजी), सुयोग वाचनालयाचे संचालक रवी जैन, अंजली जैन, व्यवस्थापिका संतोषी भोपळे, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, चंद्रकांत जंजीरे, संदीप पूरकर, अशोक देशमुख उपस्थित होते. शिंदे म्हणाले, की समाजात चांगली कामे करणारी माणसं आहेत व त्यांच्यावरच हे जग चालत आहे. आपल्याकडे सगळ्या सुख-सुविधा आहेत. मात्र त्याबरोबरच वृद्धाश्रमही आहेत, ही समाजाची शोकांतिका आहे. सुयोग वाचनालयापासून विद्यानगर परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी बाबा परीट यांनी कथाकथन सादर केले, तर प्रशांत मोरे, तुकाराम धांडे, घनश्याम धेंडे, भरत दौंडकर, धनंजय सोलंकर, विष्णू थोरे, रुपाली अवचरे, अस्मिता जोगदंड, पुरुषोत्तम सदाफुले या कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. एड्सग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या दत्ता बारगजे व संध्या बारगजे या दाम्पत्याला ‘स्वर्गीय शकुंतला जयकुमार जैन कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.