शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारेच खरे साहित्य

By admin | Updated: January 21, 2015 00:40 IST

समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारे लेखन म्हणजे खरे साहित्य असते. प्रत्येक माणूस स्वत:शी बोलत असतो. पारतंत्र्याला पराभूत करण्याची प्रेरणा देणारी माणसंच थोर आहेत,

येरवडा : समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारे लेखन म्हणजे खरे साहित्य असते. प्रत्येक माणूस स्वत:शी बोलत असतो. पारतंत्र्याला पराभूत करण्याची प्रेरणा देणारी माणसंच थोर आहेत, नाहीतर कोणीच स्वतंत्र नाही. समाजात थोर माणसं नसती तर साहित्यकारांनाही सामाजिक साहित्य लिहिता आले नसते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मु. शिंंदे यांनी केले. टिंंगरेनगरमध्ये सुयोग वाचनालयाच्या वतीने आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फ. मु. शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष बापू कर्णे (गुरुजी), सुयोग वाचनालयाचे संचालक रवी जैन, अंजली जैन, व्यवस्थापिका संतोषी भोपळे, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, चंद्रकांत जंजीरे, संदीप पूरकर, अशोक देशमुख उपस्थित होते. शिंदे म्हणाले, की समाजात चांगली कामे करणारी माणसं आहेत व त्यांच्यावरच हे जग चालत आहे. आपल्याकडे सगळ्या सुख-सुविधा आहेत. मात्र त्याबरोबरच वृद्धाश्रमही आहेत, ही समाजाची शोकांतिका आहे. सुयोग वाचनालयापासून विद्यानगर परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी बाबा परीट यांनी कथाकथन सादर केले, तर प्रशांत मोरे, तुकाराम धांडे, घनश्याम धेंडे, भरत दौंडकर, धनंजय सोलंकर, विष्णू थोरे, रुपाली अवचरे, अस्मिता जोगदंड, पुरुषोत्तम सदाफुले या कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. एड्सग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या दत्ता बारगजे व संध्या बारगजे या दाम्पत्याला ‘स्वर्गीय शकुंतला जयकुमार जैन कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.