शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

लग्नसमारंभातील अक्षतांचा वापर रानातल्या पाखरांसाठी

By admin | Updated: April 18, 2017 02:49 IST

लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे.

अशोक खरात, खोडदलग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, लग्नसमारंभ झाल्यानंतर वधू-वरांवर वर्षाव केलेल्या या अक्षता पायदळी तुडवल्या जाऊन कचऱ्यात जातात. या अक्षता कचऱ्यात जाऊ न देता त्या सर्व अक्षता गोळा करून दुर्गम भागातील रानातील पाखरांना टाकून या पाखरांचा पोटाचा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील रवी जयराम हांडे यांनी गेल्या ३ वर्षांपासून सुरू केला आहे.आपण आपल्या घासातला घास एखाद्याला दिला तर निश्चितच आपले आणि ज्याला दिलाय त्याचीही भूक भागू शकते. पण आपण जर आपल्या घासातला घास किंवा आपल्याकडून नकळतपणे वाया जाणारे अन्नाचे कण जर निसर्गातील मुक्या जीवांना दिले, तर त्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. शिवाय आपल्या हातून पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याची सकारात्मक भावना मनाशी बाळगून रवी हांडे यांनी हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतले. सध्या लग्नसराईचा काळ आहे. अनेक ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या तर काही ठिकाणी खासगी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह होत आहेत. जुन्नर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होतात, अशा सर्वच ठिकाणी व देवस्थान ट्रस्ट असलेल्या ठिकाणी जाऊन सोहळा पार पडल्यानंतर मंडपातील किंवा हॉलमधील सर्व अक्षता गोळा करून त्या आणल्या जातात. या अक्षतांना खाद्यपदार्थांना वापरले जाणारे रंग लावलेले असतात.