शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

लग्नसमारंभातील अक्षतांचा वापर रानातल्या पाखरांसाठी

By admin | Updated: April 18, 2017 02:49 IST

लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे.

अशोक खरात, खोडदलग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, लग्नसमारंभ झाल्यानंतर वधू-वरांवर वर्षाव केलेल्या या अक्षता पायदळी तुडवल्या जाऊन कचऱ्यात जातात. या अक्षता कचऱ्यात जाऊ न देता त्या सर्व अक्षता गोळा करून दुर्गम भागातील रानातील पाखरांना टाकून या पाखरांचा पोटाचा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील रवी जयराम हांडे यांनी गेल्या ३ वर्षांपासून सुरू केला आहे.आपण आपल्या घासातला घास एखाद्याला दिला तर निश्चितच आपले आणि ज्याला दिलाय त्याचीही भूक भागू शकते. पण आपण जर आपल्या घासातला घास किंवा आपल्याकडून नकळतपणे वाया जाणारे अन्नाचे कण जर निसर्गातील मुक्या जीवांना दिले, तर त्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. शिवाय आपल्या हातून पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याची सकारात्मक भावना मनाशी बाळगून रवी हांडे यांनी हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतले. सध्या लग्नसराईचा काळ आहे. अनेक ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या तर काही ठिकाणी खासगी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह होत आहेत. जुन्नर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होतात, अशा सर्वच ठिकाणी व देवस्थान ट्रस्ट असलेल्या ठिकाणी जाऊन सोहळा पार पडल्यानंतर मंडपातील किंवा हॉलमधील सर्व अक्षता गोळा करून त्या आणल्या जातात. या अक्षतांना खाद्यपदार्थांना वापरले जाणारे रंग लावलेले असतात.