शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हडपसर ते उरुळी कांचन प्रवास करताय? सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:34 IST

सायंकाळी ६ नंतर जबरदस्त वाहतूककोंडी : पोलीस प्रशासनाची भूमिका ठरणार महत्त्वाची

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान सायंकाळी ६ नंतर चारचाकी वाहनाने किंवा अन्य मोठ्या वाहनाने प्रवास करीत असाल, तर तयारी ठेवा दोन ते तीन तास रस्त्यातील वाहतूककोंडीत अडकून पडण्याची! या महामार्गावरील मंगल कार्यालयांंत लग्नसराईच्या धूमधडाक्याने सायंकाळी ५ ते ६ नंतर प्रचंड प्रमाणात ह्यकृत्रिमह्ण वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त होऊन गेले आहेत .

या दरम्यान प्रवास करताना जादा वेळेचे नियोजन करून प्रवासाचे अंतिम ठिकाणी पोहोचण्याचे नियोजन करणे झाले आहे गरजेचे. पुणे ग्रामीण व शहर पोलीस तासन् तास महामार्ग तुंबून वाहतूककोंडीची घुसमट काढण्यास अपयशी ठरल्याने या महामार्गवर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

पुणे - सोलापूर महामार्गावरील ह्यपंचतारांकितह्ण मंगल कार्यालयांत लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे. या ठिकाणच्या प्रतिष्ठितांच्या लग्नसोहळ्यांमुळे व त्यांच्याकडे येणाऱ्या शाही पाहुण्यांमुळे हडपसर ते उरुळी कांचनपर्यंतदरम्यानचा रस्ता या मंडळींच्या वाहनांसाठीचा वाहनतळ बनला आहे. या वाहनांच्या आक्राळविक्राळ पार्किंगने वाहतुककोंडीचा मोठा त्रास सर्वसामान्य जनतेला, पांढरपेशा नोकरवर्गाला सातत्याने अनुभवावा लागत आहे, या बेशिस्त वाहतुकीचा बोजा रस्तांवर पडल्याने प्रचंड वाहतूककोडींची समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर या महामार्गावरील मंगलकार्यालयातील लग्नसमारंभानिमित्त फटाक्यांचे बार उडू लागल्यावर तर या ठिकाणी वाहतूककोंडी बघायलाच नको.

हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान २० किलोमीटर महामार्गावर अनेक मोठी मंगलकार्यालये आहेत. या कार्यालयात होणारे लग्नसभारंभ, साखरपुडे ,टिळे, वाढदिवस आदी कार्यक्रम प्रचंड थाटामाटात होत असल्याने या कार्यालयांचे मालक व यजमानांचे आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी यांना सार्वजनिक वाहतूककोंडीचे काहीच सोयरसुतक राहिलेले दिसत नाही. ते आपल्या तालात मश्गुल होऊन नाचत असतात, तर जनता नाखुशीने ताटकळत वाहतूककोंडीत उभी असते.

महामार्गावरील १५ नंबर, शेवाळेवाडी, कवडीपाट, लोणी स्टेशन, थेऊर फाटा, उरुळी कांचनपर्यंतची या ठिकाणच्या वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. परिणामी चारपदरी असलेला हा महामार्ग वाहतुकीला तोकडा पडू लागला आहे. सायंकाळी उद्भवणाºया या परिस्थितीने या दरम्यान प्रवास करणाºया प्रवासी, नोकरदार वगार्ला प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. तासन् तास हा रस्ता वाहतुकीने चक्काजाम होऊ लागल्याने काही मिनिटांचा या दरम्यानचा प्रवास काही तासांचा बनला आहे.हडपसर ते कवडीपाट टोलनाका ही हद्द शहर पोलिसांकडे तर कवडीपाट ते उरुळी कांचन हद्द ग्रामीण पोलिसांकडे आहे. परंतु या नित्याच्या वाहतूककोंडीवर वाहतूक पोलिसांना अजून तरी या वाहतूककोंडीची समस्या सुटणे मुश्कील झाले आहे. या वाहतुकीवर व बेशिस्तपणावर कठोर कारवाई होत नसल्याने निर्ढावलेली जनता वाहतूककोंडीची समस्या तीव्र करीत आहे.बेशिस्त वाहतूक व मंगलकार्यालयांवर ठोस कारवाई होत नसल्याने वाहतुकीची समस्या भविष्यात अधिकच वाढणारआहे हे नक्की!

टॅग्स :Puneपुणे