शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कर्मचाऱ्यांना प्रवासाचा ताण

By admin | Updated: February 21, 2017 03:32 IST

सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणाऱ्यांना बसची खास सुविधा केली जाते. मात्र मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या निवडणूक

पुणे : सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणाऱ्यांना बसची खास सुविधा केली जाते. मात्र मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वत:च्या वाहनानेच नियुक्त केलेल्या क्षेत्रीय कार्यालयापर्यंत जावे लागले. राहत्या ठिकाणापासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून महिला कर्मचाऱ्यांना बस, रिक्षाने किंवा स्वत:च्या वाहनावरून जावे लागले.ज्येष्ठ महिलांना या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहे. महिला पोलिसांचाही त्यात समावेश आहे. नऱ्हे भागात राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेला बसने पुणे स्टेशनपर्यंत, तेथून रिक्षाने वडगाव शेरीमधील राजाराम पठारे स्टेडियमपर्यंत जावे लागले. तर माणिकबाग परिसरात राहणाऱ्या अन्य एका शिक्षकाला स्वत:च्या दुचाकीवरून या केंद्रापर्यंत पोहोचावे लागले.या क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात सुमारे १००० कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास होते. त्यांना साधा चहा देण्याचे सौजन्य निवडणूक कार्यालयाने दाखवले नाही. पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नव्हती. त्यामुळे स्वत:च्या खर्चानेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी आणल्या.सकाळी साडेआठ वाजता हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण साडेदहा वाजता सुरु झाले. त्यानंतर दुपारी दोननंतर त्यांना मतदानयंत्रे व तत्सम साहित्य घेऊन बसने मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. या कर्मचाऱ्यांमध्ये काही आजारी महिला होत्या. (प्रतिनिधी)अमराठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रश्नकेंद्र सरकारच्या एलआयसी किंवा तत्सम कंपन्यांचे कर्मचारीही पालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले असून, एका केंद्रामध्ये नियुक्त झालेल्या अमराठी केंद्रप्रमुखांना मराठी येत नसल्याने त्यांचे काम अन्य कर्मचाऱ्यांनाच करावे लागले. निवडणुकीसाठी दिली जाणारी प्रशिक्षण पुस्तिका हिंदी भाषेत असल्यास अशी अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया या केंद्रामधील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. रात्री झोपण्याची, जेवणाची सुविधा या कर्मचाऱ्यांना स्वत:च करावी लागणार असून, मंगळवारी सकाळी अंघोळीची, प्रातर्विधीची सुविधा नसल्याने त्यांचे हाल होणार आहेत. एकमेकांशी सहकार्य करून हे कर्मचारी घर जवळ असल्यास पहाटे घरी जाऊ शकतील. दूर अंतरावर राहणाऱ्यांना मात्र असुविधेला तोंड द्यावे लागणार आहे. मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा या उमेदवारांना क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत बसने पोहोचविले जाईल. त्यानंतर त्यांना स्वत:च्या वाहनाने किंवा बसने घरापर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांसाठी रात्री ११पासून खास बससेवा दिली जाते, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी सुविधा देण्याचे गांभीर्य का नाही, अशी प्रतिक्रिया या यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.