शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कचराकोंडी फुटली; फुरसुंगी ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:02 IST

गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले.

पुणे : गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले. यामुळे दोन दिवसांपासून शहराची झालेली कचरा कोेंडी फुटली आहे.हरित न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने फुरसुंगी येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग तातडीने बंद करावे या प्रमुख मागणीसह कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवार (दि. १) पासून कचरा डेपो बंद आंदोलन सुरू केले होते.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन मागे घ्यावे यासाठी चर्चा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत मागण्यावर कोणतेही ठोसआश्वासन मिळत नसल्याने गुरुवारीदेखील कचऱ्यांची एकही गाडी येऊ दिली नाही.यामुळे गुरुवारी दुपारी पुन्हा निंबाळकर यांच्या कार्यालयात स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली.या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबांना महापालिकेने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, भेकराईनगर ते फुरसुंगी गावापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करावा, मंतरवाडी ते सोलापूर रोडपर्यंत एक्स्प्रेस ड्रेनेज लाइनच्या कामाची सुरुवात करावी, मंतरवाडी चौक ते फुरसुंगी गावातील दशक्रिया विधी घाटाचे काम लवकर पूर्ण करावे, फुरसुंगी गावातील वॉटर फिल्टर प्लँटसाठी खासदार संजय काकडे यांनी निधी दिला आहे. त्यातून या प्लँटचे काम तातडीने सुरू करावे, फुरसुंगीतून सोलापूर रस्त्याकडे जाणाºया पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.दोन दिवस नाही उचलला कचराया आंदोलनामुळे शहरातील काही भागातील कचरा दोन दिवस उचलला गेला नाही. भर पावसाळ्यात कचºयाचे आंदोलन पेटले असते, तर शहरात कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली असती.यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महापालिका प्रशासन, पदाधिकारी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांच्या सतत संपर्कात होते.कायदेशीर दृष्ट्या वारसदारांना पुढील महिनाभरात महापालिका सेवेत कायम केले जाईल. तसेच, विकासकामांचे इस्टिमेट तयार करून, तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर, त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर दुपारपासून पूर्ववत कचरा डेपो सुरू करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे