शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

कचराकोंडी फुटली; फुरसुंगी ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:02 IST

गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले.

पुणे : गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले. यामुळे दोन दिवसांपासून शहराची झालेली कचरा कोेंडी फुटली आहे.हरित न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने फुरसुंगी येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग तातडीने बंद करावे या प्रमुख मागणीसह कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवार (दि. १) पासून कचरा डेपो बंद आंदोलन सुरू केले होते.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन मागे घ्यावे यासाठी चर्चा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत मागण्यावर कोणतेही ठोसआश्वासन मिळत नसल्याने गुरुवारीदेखील कचऱ्यांची एकही गाडी येऊ दिली नाही.यामुळे गुरुवारी दुपारी पुन्हा निंबाळकर यांच्या कार्यालयात स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली.या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबांना महापालिकेने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, भेकराईनगर ते फुरसुंगी गावापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करावा, मंतरवाडी ते सोलापूर रोडपर्यंत एक्स्प्रेस ड्रेनेज लाइनच्या कामाची सुरुवात करावी, मंतरवाडी चौक ते फुरसुंगी गावातील दशक्रिया विधी घाटाचे काम लवकर पूर्ण करावे, फुरसुंगी गावातील वॉटर फिल्टर प्लँटसाठी खासदार संजय काकडे यांनी निधी दिला आहे. त्यातून या प्लँटचे काम तातडीने सुरू करावे, फुरसुंगीतून सोलापूर रस्त्याकडे जाणाºया पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.दोन दिवस नाही उचलला कचराया आंदोलनामुळे शहरातील काही भागातील कचरा दोन दिवस उचलला गेला नाही. भर पावसाळ्यात कचºयाचे आंदोलन पेटले असते, तर शहरात कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली असती.यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महापालिका प्रशासन, पदाधिकारी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांच्या सतत संपर्कात होते.कायदेशीर दृष्ट्या वारसदारांना पुढील महिनाभरात महापालिका सेवेत कायम केले जाईल. तसेच, विकासकामांचे इस्टिमेट तयार करून, तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर, त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर दुपारपासून पूर्ववत कचरा डेपो सुरू करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे