शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

कचराकोंडी फुटली; फुरसुंगी ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:02 IST

गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले.

पुणे : गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले. यामुळे दोन दिवसांपासून शहराची झालेली कचरा कोेंडी फुटली आहे.हरित न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने फुरसुंगी येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग तातडीने बंद करावे या प्रमुख मागणीसह कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवार (दि. १) पासून कचरा डेपो बंद आंदोलन सुरू केले होते.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन मागे घ्यावे यासाठी चर्चा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत मागण्यावर कोणतेही ठोसआश्वासन मिळत नसल्याने गुरुवारीदेखील कचऱ्यांची एकही गाडी येऊ दिली नाही.यामुळे गुरुवारी दुपारी पुन्हा निंबाळकर यांच्या कार्यालयात स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली.या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबांना महापालिकेने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, भेकराईनगर ते फुरसुंगी गावापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करावा, मंतरवाडी ते सोलापूर रोडपर्यंत एक्स्प्रेस ड्रेनेज लाइनच्या कामाची सुरुवात करावी, मंतरवाडी चौक ते फुरसुंगी गावातील दशक्रिया विधी घाटाचे काम लवकर पूर्ण करावे, फुरसुंगी गावातील वॉटर फिल्टर प्लँटसाठी खासदार संजय काकडे यांनी निधी दिला आहे. त्यातून या प्लँटचे काम तातडीने सुरू करावे, फुरसुंगीतून सोलापूर रस्त्याकडे जाणाºया पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.दोन दिवस नाही उचलला कचराया आंदोलनामुळे शहरातील काही भागातील कचरा दोन दिवस उचलला गेला नाही. भर पावसाळ्यात कचºयाचे आंदोलन पेटले असते, तर शहरात कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली असती.यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महापालिका प्रशासन, पदाधिकारी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांच्या सतत संपर्कात होते.कायदेशीर दृष्ट्या वारसदारांना पुढील महिनाभरात महापालिका सेवेत कायम केले जाईल. तसेच, विकासकामांचे इस्टिमेट तयार करून, तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर, त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर दुपारपासून पूर्ववत कचरा डेपो सुरू करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे