शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

चाकणमध्ये कचऱ्याचे साम्राज्य, प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:09 IST

बिरदवडीतील मुळेवस्ती : प्लॅस्टिकबंदी होऊनही प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर

चाकण : परिसरातील गावांमध्ये कचºयाची समस्या दिवसेंदिवस गहण होत चालली आहे. बिरदवडी येथील मुळे वस्तीवरील नागरिक आंबेठाण रस्त्यावर कचरा भिरकावतात. त्यामुळे या रस्त्यावर कचºयाचा ढीग अक्षरश: हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत चालला आहे. शिवाय शासनाने प्लॅस्टिकबंदी करूनही या कचºयाच्या ढिगामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे.

चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील प्रत्येक गावात नागरीकरण वाढले आहे. परिसरातील गावांमधून दररोज हजारो टन कचरा निघतो. या कचºयाची विल्हेवाट लावणे हे सर्व ग्रामपंचायतींपुढे मोठे आव्हान आहे. कचºयापासून खतनिर्मिती केल्यास मोठी समस्या सुटेल, पण त्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्लॅस्टिकबंदी घोषित केल्यापासून अनेक नागरिकांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे, मात्र अजूनही काही नागरिक बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशवी, कॅरीबॅग वापरीत आहेत. चाकण नगरपरिषद व परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी अधिकृतपणे रिक्षा फिरवून दवंडी देऊन प्रबोधन केले तरीही नागरिक प्लॅस्टिक वापरताना दिसत आहे. प्लॅस्टिक वापरणारांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत नागरिक याबाबत गांभीर्याने घेणार नाहीत असे चित्र दिसत आहे. घरांमधून निघणारा हा कचरा नागरिक परिसरातील रस्त्यांच्या कडेला फेकतात. ग्रामपंचायती घंटा गाड्यांमधून कचरा गोळा करतात, पण कंपन्यांमध्ये नोकरी करणारे बहुतांश नवरा-बायको दोघेही कामावर कामावर जाता-जाता घरातील कचरा ढिगांवर टाकतात. कंपन्यांचा कचरा आळंदी घाटातील वन विभागात व एमआयडीसीच्या रस्त्यांच्या कडेला टाकला जातो, तर परिसरातील ग्रामपंचायतींचा कचरा खराबवाडीच्या दगड खाणीत गुपचूप टाकला जातो. एमआयडीसीतील अराई कंपनी ते सारा सिटी रस्त्यावर औद्योगिक कंपन्यांनी कचºयाचे आगार केले आहे. या कचºयाच्या ढिगावर बेवारस भटकी कुत्री ताव मारताना दिसत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे