शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चाकणमध्ये कचऱ्याचे साम्राज्य, प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:09 IST

बिरदवडीतील मुळेवस्ती : प्लॅस्टिकबंदी होऊनही प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर

चाकण : परिसरातील गावांमध्ये कचºयाची समस्या दिवसेंदिवस गहण होत चालली आहे. बिरदवडी येथील मुळे वस्तीवरील नागरिक आंबेठाण रस्त्यावर कचरा भिरकावतात. त्यामुळे या रस्त्यावर कचºयाचा ढीग अक्षरश: हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत चालला आहे. शिवाय शासनाने प्लॅस्टिकबंदी करूनही या कचºयाच्या ढिगामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे.

चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील प्रत्येक गावात नागरीकरण वाढले आहे. परिसरातील गावांमधून दररोज हजारो टन कचरा निघतो. या कचºयाची विल्हेवाट लावणे हे सर्व ग्रामपंचायतींपुढे मोठे आव्हान आहे. कचºयापासून खतनिर्मिती केल्यास मोठी समस्या सुटेल, पण त्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्लॅस्टिकबंदी घोषित केल्यापासून अनेक नागरिकांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे, मात्र अजूनही काही नागरिक बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशवी, कॅरीबॅग वापरीत आहेत. चाकण नगरपरिषद व परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी अधिकृतपणे रिक्षा फिरवून दवंडी देऊन प्रबोधन केले तरीही नागरिक प्लॅस्टिक वापरताना दिसत आहे. प्लॅस्टिक वापरणारांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत नागरिक याबाबत गांभीर्याने घेणार नाहीत असे चित्र दिसत आहे. घरांमधून निघणारा हा कचरा नागरिक परिसरातील रस्त्यांच्या कडेला फेकतात. ग्रामपंचायती घंटा गाड्यांमधून कचरा गोळा करतात, पण कंपन्यांमध्ये नोकरी करणारे बहुतांश नवरा-बायको दोघेही कामावर कामावर जाता-जाता घरातील कचरा ढिगांवर टाकतात. कंपन्यांचा कचरा आळंदी घाटातील वन विभागात व एमआयडीसीच्या रस्त्यांच्या कडेला टाकला जातो, तर परिसरातील ग्रामपंचायतींचा कचरा खराबवाडीच्या दगड खाणीत गुपचूप टाकला जातो. एमआयडीसीतील अराई कंपनी ते सारा सिटी रस्त्यावर औद्योगिक कंपन्यांनी कचºयाचे आगार केले आहे. या कचºयाच्या ढिगावर बेवारस भटकी कुत्री ताव मारताना दिसत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे