शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

पिंजरा लावला; सावज कुठयं?

By admin | Updated: May 1, 2017 02:21 IST

मांजरी खुर्द येथील खैराड वस्तीत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यांत सावजच ठेवले नसल्याने

आव्हाळवाडी : मांजरी खुर्द येथील खैराड वस्तीत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यांत सावजच ठेवले नसल्याने बिबट्या शेतकऱ्यांना चकवा देऊन जात असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने तब्बल आठ दिवस पिंजरा लावूनही पिंजऱ्यात सावज नसल्याने मांजरी येथे बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा म्हणजे ‘वास्तुसंग्रहालयातील पिंजरा’ असल्याचे शेतकरी रामचंद्र उंद्रे, जयवंत उंद्रे, नाथाभाऊ उंद्रे, संजय साळुंके, राजेंद्र साळुंके, योगेश उंद्रे या परिसरातील शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.उन्हाचा कडाका लागत असून दुपारी काम होत नाही. सकाळ संध्याकाळ बिबट्याची दहशत असून शेतीची कामे करता येत नाही. त्यात विहिरीला पाणी कमी होत आहे. लाईट नसल्याने पिके सुकून चालली आहेत. मांजरी गावचे पोलीस पाटील अंकुश उंद्रे, शेतकरी संजय साळुंके, योगेश उंद्रे,भगवान गिरी यांच्या सहकार्याने दोनच दिवस सावज म्हणून (शेळी/बकरी) ठेवली होती. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयच नसल्याने शेतात बिबट्या पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा सावज न ठेवल्याने फक्त परिसरातील शेतकऱ्यांना पिंजरा असून अडचण नसून खोळंबा असे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या बाबत हवेली वन क्षेत्रपाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, मांजरी येथे पिंजऱ्यात दररोज सावज ठेवत असल्याचे वन कर्मचारी व अधिकारी सांगत असल्याचे सांगितले. पण मांजरी परिसरात पिंजरा लावल्यानंतर फक्त दोन दिवसस कर्मचारी आले, परत ते फिरकलेच नाहीत, असे वरील शेतकरी ठामपणे सांगत आहेत.यवत : येथील गाडगीळवस्ती व माटोबा तलावाच्या परिसरात दोन ते तीन महिन्यांनंतर परत एकदा बिबट्या आढळून आल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील तीन दिवसांत दोन वेळा बिबट्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी दिसला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास दोरगे यांना तीन दिवसांपूर्वी बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसला होता. तर काल रात्री शेतकरी अवचट यांना बिबट्या दिसून आला. मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी असेच बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते, तर काही पाळीव जानवरे व कुत्रीदेखील बिबट्याने मारली होती. मात्र जूना कालवा व ब्रिटिशकालीन माटोबा तलाव या परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्या उसातून लपून पळ काढत असल्याने वन विभागाला बिबट्या सापडला अथवा दिसला नव्हता. काही दिवस बिबट्या न दिसल्याने कदाचित तो दुसऱ्या ठिकाणी गेला असेल, असे नागरिकांना वाटल्याने शेतकरी निर्धास्त झाले होते. तीन महिन्यांनंतर आता परत बिबट्याचे दर्शन झाल्याने परत एकदा धास्तावला आहे.