शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पिंजरा लावला; सावज कुठयं?

By admin | Updated: May 1, 2017 02:21 IST

मांजरी खुर्द येथील खैराड वस्तीत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यांत सावजच ठेवले नसल्याने

आव्हाळवाडी : मांजरी खुर्द येथील खैराड वस्तीत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यांत सावजच ठेवले नसल्याने बिबट्या शेतकऱ्यांना चकवा देऊन जात असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने तब्बल आठ दिवस पिंजरा लावूनही पिंजऱ्यात सावज नसल्याने मांजरी येथे बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा म्हणजे ‘वास्तुसंग्रहालयातील पिंजरा’ असल्याचे शेतकरी रामचंद्र उंद्रे, जयवंत उंद्रे, नाथाभाऊ उंद्रे, संजय साळुंके, राजेंद्र साळुंके, योगेश उंद्रे या परिसरातील शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.उन्हाचा कडाका लागत असून दुपारी काम होत नाही. सकाळ संध्याकाळ बिबट्याची दहशत असून शेतीची कामे करता येत नाही. त्यात विहिरीला पाणी कमी होत आहे. लाईट नसल्याने पिके सुकून चालली आहेत. मांजरी गावचे पोलीस पाटील अंकुश उंद्रे, शेतकरी संजय साळुंके, योगेश उंद्रे,भगवान गिरी यांच्या सहकार्याने दोनच दिवस सावज म्हणून (शेळी/बकरी) ठेवली होती. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयच नसल्याने शेतात बिबट्या पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा सावज न ठेवल्याने फक्त परिसरातील शेतकऱ्यांना पिंजरा असून अडचण नसून खोळंबा असे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या बाबत हवेली वन क्षेत्रपाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, मांजरी येथे पिंजऱ्यात दररोज सावज ठेवत असल्याचे वन कर्मचारी व अधिकारी सांगत असल्याचे सांगितले. पण मांजरी परिसरात पिंजरा लावल्यानंतर फक्त दोन दिवसस कर्मचारी आले, परत ते फिरकलेच नाहीत, असे वरील शेतकरी ठामपणे सांगत आहेत.यवत : येथील गाडगीळवस्ती व माटोबा तलावाच्या परिसरात दोन ते तीन महिन्यांनंतर परत एकदा बिबट्या आढळून आल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील तीन दिवसांत दोन वेळा बिबट्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी दिसला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास दोरगे यांना तीन दिवसांपूर्वी बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसला होता. तर काल रात्री शेतकरी अवचट यांना बिबट्या दिसून आला. मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी असेच बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते, तर काही पाळीव जानवरे व कुत्रीदेखील बिबट्याने मारली होती. मात्र जूना कालवा व ब्रिटिशकालीन माटोबा तलाव या परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्या उसातून लपून पळ काढत असल्याने वन विभागाला बिबट्या सापडला अथवा दिसला नव्हता. काही दिवस बिबट्या न दिसल्याने कदाचित तो दुसऱ्या ठिकाणी गेला असेल, असे नागरिकांना वाटल्याने शेतकरी निर्धास्त झाले होते. तीन महिन्यांनंतर आता परत बिबट्याचे दर्शन झाल्याने परत एकदा धास्तावला आहे.