शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

पारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:00 IST

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुणे : स्मार्ट सिटीअतंर्गत नक्की काय कामे सुरु आहेत, कामांची निवड परस्पर केली जाते, प्रकल्प निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विचारात घेतले जात नाही, बैठकांना बोलाविले जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. यामध्ये त्वरित सुधारणा करा, संबंधित आमदार, नगरसेवकांच्या दर महिन्याला बैठका घ्या, कामरभार पादर्शक झाला पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सध्या शहरात सुरू असलेले व भविष्यात नव्याने सुरू करण्यात येणाºया प्रकल्पाची माहिती व चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, आयुक्त सौरभ राव, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमांबाबत लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही, बैठकांसाठी बोलविले जात नाही, रस्ते किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे प्रकल्प राबविताना विचारात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. यापुढे संबंधित आमदार, नगरसेविकांच्या नियमित बैठका घेऊन माहिती द्या, तसेच मी स्वत: दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन स्मार्ट सिटीचे काय काम सुरू आहे, आढावा घेणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.जगताप म्हणाले, की स्मार्ट सिटीला गेल्या दोन वर्षांत ३०१ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यामध्ये १९४ कोटी केंद्र शासन, ९८ कोटी राज्य शासन आणि १०१ कोटी पुणे महापालिकेकडून उपलब्ध झाला आहे. यापैकी आतापर्यंत ११७ कोटींचा खर्च केला असून, तब्बल ४८० कोटींच्या कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या आहेत. तर आता पर्यंत १२ कामे पूर्ण झाली असून, २६ कामे सुरु आहेत. नव्याने १७ कामांचे टेंडर करण्यात आली असून, सात कामांचा डीपीआर करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवास्मार्ट सिटी असो की पुणे महापालिका गेल्या काही वर्षांत प्रत्येक कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीने दोन वर्षांत सल्लागारांवर ३० ते ४० कोटी खर्च केले आहेत. या सल्लागारांनी काय कामे केली, जबाबदारी काय, किती कामे पूर्ण केली, याची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांना दिले.शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागारांचे सल्ले घेऊन केलेली अनेक कामे फसली असल्याचे शहरात झालेल्या उड्डाणपुलांच्या कामांवरून स्पष्ट होईल. त्यामुळे सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची बिलं देताना नक्की काय काम केले व शहराला उपयोग झाला का, याची खात्री केली पाहिजे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे