शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 13:24 IST

विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे.

ठळक मुद्देरेखा ढोले स्मृती पुरस्कार‘भगतसिंगचा खटला-न्यायाच्या हत्येचे कारस्थान’च्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अनुवादासाठी केवळ भाषिक अभिज्ञता (ज्ञान) उपयोगाची नसते, त्यासाठी भाषिक संवेदनशीलताही लागते. अनुवाद हे केवळ भाषांतरशास्त्र नाही, ती कला असते. मूळ लेखकाच्या निर्मितीतील वाचनीयता जपत शब्दांच्या खिडकीतून रस्ता मोकळा करावा लागतो. विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे. अनुभवाच्या देवघेवाणीचा अनुवाद ही उत्तुंग अनुभूती आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी अनुवादाचे शास्त्र उलगडले. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले परिवारातर्फे रेखा ढोले स्मृती पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल करुणा गोखले यांना, सर्वोत्कृष्ट निर्मितीमुल्ये, मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीबद्दल राधिका टिपणीस यांना प्रदान करण्यात आला. ज्योत्स्ना प्रकाशनाला ‘बालाचा बेडुकमित्र आणि इतर’ या पुस्तकाचाही गौरव करण्यात आला. डॉ. ढेरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ए.जी.नुराणी लिखित ‘भगतसिंगचा खटला-न्यायाच्या हत्येचे कारस्थान’च्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. सदानंद बोरसे आणि रेखा ढोले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.करुणा गोखले म्हणाल्या, ‘माझ्या अनुवादक म्हणून घडण्यामध्ये राजहंसचा मोठा वाटा आहे. मराठीमधील साहित्य इतर भाषांमध्ये का जात नाही, असे विचारले जाते. अनुवादासाठी मातृभाषा जास्त जवळची वाटते. त्यातून अधिक सर्जनशीलतेने लिहिता येते. इंग्रजी माध्यमातून शिकणा-ाा मुलांना महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे वावडे नाही. त्यांना मराठी साहित्य श्राव्य स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास अनुवादाचे प्रमाण वाढेल. त्यासाठी लेखक, अनुवादक, प्रकाशक, विद्यापीठे अशा सर्वांनाच रस घ्यावा लागेल. सांघिक प्रयत्नातून अनुवादाला प्रोत्साहन मिळेल. बहुभाषिक संस्कृतीमध्ये सामूहिक प्रकल्प जास्त यशस्वी होऊ शकतात.’मिलिंद परांजपे म्हणाले, ‘बालसाहित्य हा दुर्लक्षित राहिलेला प्रकार आहे. मुलांच्या पुस्तकांसाठी लेखन, चित्रे यांचा वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागतो. मराठीत मुलांसाठी नव्या रंगाढंगात आली पाहिजेत. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, उणीव आहे ती निर्मितीमूल्यांची. ती उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, रेखा ढोले यांचे पती प्रवीण ढोले, मैत्रीण सुषमा निसळ, डॉ. श्रीराम गीत आदी उपस्थित होते. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले...............आपल्याकडे चित्रसाक्षरता खूप कमी आहे. भाषा शिकतो आणि ती येते, म्हणून वापरली जाते. मात्र, नृत्य, चित्रांकडे दुर्लक्ष होते. बालवाड्मय लिहिणे आणि प्रकाशित करणे सोपे वाटते. पण,क तोच सगळ्यात अवघड प्रकार आहे. जागतिक पातळीवर काय चालले आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे काम करणारे प्रकाशक फार कमी असतात. अनुवादामागे विशिष्ट वाड्मयीन दृष्टी असते. - डॉ. अरुणा ढेरे 

टॅग्स :PuneपुणेAruna Dhereअरुणा ढेरेliteratureसाहित्य