शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

तब्बल १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: July 10, 2015 02:14 IST

महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने बदलीच्या आदेशामध्ये दिला आहे.शासनाच्या सेवा नियमावलीनुसार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर ३ वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे हितसंबंध तयार होऊ नयेत याकरिता हा दंडक घालून देण्यात आला आहे. मात्र,पुणे महापालिकेमध्ये या नियमाला धाब्यावर बसवून अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत होते. बदली झाल्यानंतरही ते त्याच विभागात कार्यरत राहत होते. स्वयंसेवी संस्थांनी याबाबत आवाज उठविला होता, नगरसेवकांनीही मुख्य सभेमध्ये या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्या वेळी नियमित बदल्यांच्यावेळी या अधिकाऱ्यांची बदली केली जाईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.बांधकाम विभागातील ३८, पाणीपुरवठा विभागातील २९ अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. या दोन विभागांतून अधिकारी बदलीच होऊ देत नव्हते. बदली झाली तरी विभागप्रमुखांच्या आशीर्वादाने ते पुन्हा त्याच विभागात कार्यरत राहत होते. विभागप्रमुखांनी कार्यमुक्त न केल्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नव्हत्या. यंदा मात्र बदली झालेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. साहेबराव दांडगे, श्रीकांत वायंदडे, राजेंद्र वायकर यांची बांधकाम विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. मिलिंद बापट यांची बांधकाम विभागातून भवन रचना विभागात, राजेंद्र थोरात पाणीपुरवठा विभागातून बांधकाम विभागात, जयंत वाघ यांची भवन रचना विभागातून उद्यान विभागात, जयंत पवार यांची बांधकाम विभागातून उद्यान विभागात, सुरेश साळवे यांची पथ विभागातून ड्रेनेज विभागात, अजयकुमार वायसे यांची पाणीपुरवठा मधून बांधकाम, धनंजय जाधव, सुधीर कदम यांची बांधकाम विभागातून क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाईबदली झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी रूजू झाल्याचा अहवाल विभागप्रमुखांनी अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. बदली रद्द करण्यासाठी राजकीय किंवा इतर दबाब आणल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.