शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जागेचे हस्तांतर रखडले

By admin | Updated: March 14, 2017 07:59 IST

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूरची जागा देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून होत असलेल्या या विलंबामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या जैसे थे आहे. शहरामध्ये दररोज १४०० टन इतका कचरा तयार होतो, त्यापैकी ६०० टन इतका कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये उघड्यावर टाकला जात आहे. केंद्र शासनाच्या सप्टेंबर २००० मधील निर्देशानुसार शहरातील कचरा कुठेही उघडयावर टाकला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला १७ वर्षे उलटली तरी अद्याप या निर्देशांचे पालन पालिकेला करता आलेले नाही. याविरोधात पालिकेविरुद्ध हरित न्यायाधिकरणामध्ये उरुळी-देवाची कचरा डेपो संघर्ष समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आलेला आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन पुणे महापालिकेकडून वेळोवेळी देऊनही त्याचे पालन करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्नाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आता राज्य शासनाकडूनच यावर कार्यवाही होण्यास विलंब होत आहे.पिंपरी-सांडस येथील वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरिता २ वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाकडून पालिकेला देण्यात येणाऱ्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूर येथील जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जागा हस्तांतराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. कचरा प्रश्नावर आंदोलन पेटल्यानंतर प्रशासनाला तेवढ्यापुरती जाग येते, त्यानंतर कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुरेसे प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)