शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जागेचे हस्तांतर रखडले

By admin | Updated: March 14, 2017 07:59 IST

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूरची जागा देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून होत असलेल्या या विलंबामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या जैसे थे आहे. शहरामध्ये दररोज १४०० टन इतका कचरा तयार होतो, त्यापैकी ६०० टन इतका कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये उघड्यावर टाकला जात आहे. केंद्र शासनाच्या सप्टेंबर २००० मधील निर्देशानुसार शहरातील कचरा कुठेही उघडयावर टाकला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला १७ वर्षे उलटली तरी अद्याप या निर्देशांचे पालन पालिकेला करता आलेले नाही. याविरोधात पालिकेविरुद्ध हरित न्यायाधिकरणामध्ये उरुळी-देवाची कचरा डेपो संघर्ष समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आलेला आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन पुणे महापालिकेकडून वेळोवेळी देऊनही त्याचे पालन करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्नाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आता राज्य शासनाकडूनच यावर कार्यवाही होण्यास विलंब होत आहे.पिंपरी-सांडस येथील वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरिता २ वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाकडून पालिकेला देण्यात येणाऱ्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूर येथील जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जागा हस्तांतराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. कचरा प्रश्नावर आंदोलन पेटल्यानंतर प्रशासनाला तेवढ्यापुरती जाग येते, त्यानंतर कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुरेसे प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)