शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अल्पसंख्याक महाविद्यालयाच्या १४ हजार जागांचे हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:35 IST

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले

पुणे : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले असल्याने, सध्या सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करावे लागणार आहेत. शहरात ५७ अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालये असून, त्याच्या प्रवेशाच्या १८ हजार ९७५ जागा आहेत. त्यापैकी ४ हजार ४४०१ प्रवेश केंद्रीय पद्धतीने झाले असून, उर्वरित १४ हजार ५७४ जागांचे त्या त्या महाविद्यालयांकडे हस्तांतर केले जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीद्वारे आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सध्या अकरावीच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे.नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने न होता, ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ते बदल करून, येत्या १९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.>न्यायालयाच्या आदेशानुसार बदलपुण्याच्या अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने न्यायालयाच्या आदेशानुसार बदल करण्यास सुरुवात केली आहे. या महाविद्यालयांना ५० टक्के प्रवेश अल्पसंख्याक कोटा, २० टक्के इन हाऊस कोटा व ५ टक्के व्यवस्थापन कोटा, या पद्धतीने प्रवेश पार पाडायचे आहेत.शहरातील ५७ अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १८ हजार ९७५जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४ हजार ४०१ जागांवर प्रवेश झाले आहेत. उर्वरित १४ हजार ५७४ जागा महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांनी दुसºया फेरीत अल्पसंख्याक महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकले असतील, तर त्यांना तिथे प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयांमध्येप्रवेश हवा असल्यास त्यांना आता पुन्हा महाविद्यालय स्तरावर प्रवेश अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तिसºया फेरीत त्यांनी दिलेले अल्पसंख्याक महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलावे लागणार आहे.