शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

अल्पसंख्याक महाविद्यालयाच्या १४ हजार जागांचे हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:35 IST

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले

पुणे : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले असल्याने, सध्या सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करावे लागणार आहेत. शहरात ५७ अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालये असून, त्याच्या प्रवेशाच्या १८ हजार ९७५ जागा आहेत. त्यापैकी ४ हजार ४४०१ प्रवेश केंद्रीय पद्धतीने झाले असून, उर्वरित १४ हजार ५७४ जागांचे त्या त्या महाविद्यालयांकडे हस्तांतर केले जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीद्वारे आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सध्या अकरावीच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे.नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने न होता, ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ते बदल करून, येत्या १९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.>न्यायालयाच्या आदेशानुसार बदलपुण्याच्या अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने न्यायालयाच्या आदेशानुसार बदल करण्यास सुरुवात केली आहे. या महाविद्यालयांना ५० टक्के प्रवेश अल्पसंख्याक कोटा, २० टक्के इन हाऊस कोटा व ५ टक्के व्यवस्थापन कोटा, या पद्धतीने प्रवेश पार पाडायचे आहेत.शहरातील ५७ अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १८ हजार ९७५जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४ हजार ४०१ जागांवर प्रवेश झाले आहेत. उर्वरित १४ हजार ५७४ जागा महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांनी दुसºया फेरीत अल्पसंख्याक महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकले असतील, तर त्यांना तिथे प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयांमध्येप्रवेश हवा असल्यास त्यांना आता पुन्हा महाविद्यालय स्तरावर प्रवेश अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तिसºया फेरीत त्यांनी दिलेले अल्पसंख्याक महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलावे लागणार आहे.