शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वाहतूक पोलीस खच्ची!

By admin | Updated: June 17, 2015 23:40 IST

अद्याप मिसरूडही न फुटलेली पोरं ट्रिपल सीट डोळ्यासमोरून झपकन निघून जातात...मोबाईलवर रुबाबदारपणे बोलत तरुण एकेरी मार्गातून बाहेर पडतात...

चिंचवड : अद्याप मिसरूडही न फुटलेली पोरं ट्रिपल सीट डोळ्यासमोरून झपकन निघून जातात...मोबाईलवर रुबाबदारपणे बोलत तरुण एकेरी मार्गातून बाहेर पडतात...फॅमिली म्हणून पाच जणांचे ‘कुटूंब’ दुचाकीवरून बिनधास्त जाते...लाल दिवा असूनही सर्रासपणे पुढे जाणारे सुशिक्षित लोक आणि हे सारे पाहूनही न पाहिल्यासारखे करणारे वाहतूक पोलिस असे चित्र शहरात दिसते. याला कारण म्हणजे पोलिसांचे झालेले खच्चीकरण! केवळ अडविले या कारणावरून नगरसेवकाला राग आला आणि अडविणाऱ्या धडाडीच्या महिला पोलिसाला थेट बदलीला सामोरे जावे लागले. सोमवारी चिंचवडमध्ये घडलेले हे एक उदाहरण. अशा अनेक प्रसंगांना कॉन्स्टेबलना सामोरे जावे लागते.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी हटकले, तर लगेच मी कोण माहिती आहे का? एखाद्या संघटनेचा अथवा पक्षाचा पदाधिकारी आहे, असे ठणकावून सांगून कारवाई करू नये, अशा अविभार्वात संभाषण सुरू होते. कधी आमदार, खासदारांनाही थेट फोन लावले जातात. संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या हातात मोबाईल दिला जातो. समोरची व्यक्ती कोण आहे, कोणाशी संबंधित आहे, याची काही कल्पना नसते. (वार्ताहर)-पिंपरी बाजारपेठेतील वाहतूकव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तैनात केले, त्यांनी शिस्तीचा बडगा दाखवला, तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाईच्या हालचाली सुरू होतात. वरिष्ठांकडे तक्रारीची निवेदने दिली जातात. वाहतूक पोलीस अडवणूक करून पैसे उकळतात, अशा तक्रारी देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास दिला जातो. अशा घटना पिंपरीत घडलेल्या आहेत. कारवाई केली तर वरिष्ठांकडे तक्रारी, नाही केली तर मनमानी, बेशिस्तीचे दर्शन घडते. अशा स्थितीत त्या ठिकाणी काम करायचे कसे असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडतो. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असल्याची पाटी लावून जणूकाही बेशिस्त वाहन चालविण्यास मुभा मिळाली आहे, अशा आविर्भावात वागणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे वाहतूक पोलिसांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.-नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. पिंपरी कॅम्प परिसरात सरग यांनी बेशिस्त व्यापाऱ्यांच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला होता. या वेळीही अनेक राजकीय व्यक्ती व व्यापाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. राजकीय दबावामुळेच सरग यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अशा दबावामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत असल्याच्या अलेक घटना घडल्या आहेत.एका नगरसेवकाच्या अर्जाचा विचार करून माझी बदली होणे हे धक्कादायक आहे. १०० रुपये दंडाची पावती दिली होती. मात्र, पावती न देता तो वाहनाचालक निघून गेला. व त्याने नगरसेवकाला जाऊन चुकीची माहिती दिली. नगरसेवकांनी कर्मचार त्यांच्या फोनवर बोलले नाहीत. हा राग मनात ठेऊन वरिष्ठांकडे अर्ज केला. अशा अर्जाची दखल घेतली जाते, हे आश्चर्य आहे.- अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक