शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पारंपरिक तमाशा फड कर्जाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:05 IST

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.

- भरत निगडेनीरा -  पूर्वी गावातील जत्रांची शान असणारा तमाशा काळाच्या ओघात मागे पडला आहे. कुण्या गावाचं आलं पाखरू... याभावजी...बसा रावजी, सोळावं वरीस धोक्याचं यांसारखी कायम तोंडी गुणगुणली जाणारी पारंपरिक गीते आजही लोकप्रिय आहेत; मात्र या दोन दशकांचा विचार करता जनमानसाच्या हृदयावर राज्य करू शकतील अशी नवीन गीते तमाशात पुन्हा निर्माण झाली नाहीत किंवा लोकप्रिय झाली नाहीत. पूर्वीच्या तुलनेत तमाशांच्या फडाचे प्रमाण कमी झाले असून, तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला चांगले दिवस होते. त्यानंतर ८०च्या दशकात तमाशा मंडळे वाढली. विसाव्या शतकाच्या पूर्ततेपर्यंत तमाशा मंडळांची संख्या; तसेच लोककलावंतांचा आदर मानसन्मान होत होता.मात्र, गेल्या ही लोककलेला मारक ठरली. पाशात्य नृत्यप्रकारांची तरुणांवर असलेली भुरळ, मराठी, तमीळ, हिंदी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर झालेली निर्मिती तसेच वाढती चित्रपटगृहे यांकडे जनमानसाचा कल राहिला. त्यानंतर तमाशा केवळ यात्रा किंवा जत्रेचा एक औपचारिक भाग म्हणून आणला आणि पहिला जाऊ लागला. चौफुल्यासारखी ठिकाणे हळूहळू गर्दी कमी खेचू लागली. त्यातही तमाशाचा नाद वाईट! घराचं, जमीनजुमल्याचं पार वाटोळे असा प्रघात पडला आणि पांढरपेशी माणूस तमाशापासून दुरावला.एक लोककला म्हणून तमाशाकडे पाहण्याची जनमानसाची दृष्टी हरवत चालली. मात्र याचा परिणाम सर्वच तमाशा फडांवर झाला. आधीच कर्ज काढून सुरु केलेली तमाशा मंडळे ओस पडू लागली. सुपारी मिळविण्यासाठी यात्रा काळात राहुट्या उभारल्या जाऊ लागल्या. तिकिटांवरचे खेळ कमी झाले. चौफुला, कोल्हापूर यांसारखी गावांची नावे लोककलेशी निगडित राहिली. मात्र, या काळात शासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन कलावंत या क्षेत्रात येण्याचे प्रमाण प्रचंड घटलेले पाहायला मिळते.कर्ज मिळण्यास अडचणीतमाशा सुरु करण्यासाठी त्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नाही. मोठ्या भांडवलदाराला गाठून सहकर्जदार म्हणून तमाशा फड चालक कर्ज काढतात. आजही मोठ्या तमाशांच्या बाबतीत १०० ते १५० लोकांचा संसार तमाशावर चालतो. यात्रा काळात तमाशांना मागणी असते. चार महिन्यांचा काळ सोडला तर उर्वरित आठ महिने बसून काढण्याची वेळ कलावंतांवर येते. या काळात काही न काही बिदागी कलावंतांना मालकांकडून मिळते मात्र या बिदागीपोटी तमाशा मालक आणखीन कर्जात बुडालेले पाहायला मिळतात.शासनाच्या मदतीची अपेक्षाआजकाल आॅर्केस्ट्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे रात्री दहा नंतर खेळ करता येत नाहीत. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईत तमाशा पाहायला चांगला वाटतो. मात्र दुपारच्या वेळेत आॅर्केस्ट्राची सुपारी घेण्याकडे गावांचा कल वाढत आहे. यामुळे तमाशाची फरफट होत असून शासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकnewsबातम्या