मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यांवर बंदी घातली होती. तर वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळगडावर फिरायला गेलेला दहा वर्षांचा मुलगा दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडतात. या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने दुर्गभ्रंमतीवर बंदी घातली आहे. वेल्हे तालुक्यातील किल्ल्यांवरील पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ल्यावर एकच गर्दी करू लागले होते. त्यामुळे सोमवारपासून भोर तालुक्यातीला किल्ल्यांवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.
भोर तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात धबधब्यांवर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट, भाटघर आणि निरादेवघर धरणांवरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. सेल्फी काढतात. अशा वेळी होणाऱ्या धावपळीत पाय घसरून पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करीत असतात. यामुळे या गोष्टींचा विचार करून भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्ल्यांवर आणि पर्यटनस्थळांवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.
चौकट
वरंध घाट व आंबाडखिड घाट परिसरात पडतात दरडी
भोर तालुक्यात पावसाळ्यात हिरवेगार डोंगर, वृक्षवेली, फेसाळणारे धबधबे हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळ्यात भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर-मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. तर धबधब्यात दगडी पडतात यातून अपघात घडू शकतात. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
रायरेश्वर किल्ला फोटो