शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

२० किलोच्या क्रेटला मिळतोय फक्त ४० ते ५० रुपये भाव, टोमॅटो उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:47 IST

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.

ओतूर - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.टोमॅटो उत्पादनासाठी शेतकरी लागवड पूर्वमशागत, लागवड, मल्चिंग पेपर, बांधणीसाठी बांबू आदी कामासाठी विविध प्रकारच्या फवारणीनंतरतोडणीसाठी लाखो रुपये खर्च करतात.जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट आहे. सध्या या मार्केटमध्ये टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला फक्त ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळतो. या भावाने लागवडीपासून टोमॅटो मार्केटमध्ये आणण्यासाठीचा वाहतूक खर्च, तोडणी मजुरी उत्पादनासाठी जो एकूण खर्च झाला, तोही विक्रीतून मिळत नाही. फायदा नाही उलट तोटा जास्तच होतो, हे लक्षात आल्याने दुसरे पीक घेण्यासाठी टोमॅटोच्या फळांनी बहरलेल्या बागा टोमॅटोसह उपटून टाकीत आहेत. काही शेतकरी मेंढपाळांना बोलावून टोमॅटो उपटून नेण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे ऐनउन्हाळ्यात मेंढ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना अच्छे दिन आणावेत.ओतूर परिसर उदापूर, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगे व ओतूरच्या पूर्वेकडील खामुंडी, उंब्रज, डुंबरवाडी, गायमुखवाडी, उत्तरेकडील रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, पूर्वेकडील पिंपरीपेंढार या विभागात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून घेतले जाते. जिवापाड मेहनत करून शेतकरी कांदा, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकवितो, परंतु कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे तो कर्जबाजारी होत आहे.टोमॅटोच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा वापरपिंपरी पेंढार : उष्णतेपासून टोमॅटोपिकांचे संरक्षण करण्यासाठी खामुंडी (ता. जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी समीर दत्तात्रय बोडके यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर (कागद) पसरून टोमॅटो लागवड केली आहे.बदलते हवामान आणि तीव्र उन्हाळा यापासून पिकांची शेतकरीवर्ग मोठ्या कष्टाने काळजी घेत आहेत. उन्हामुळे सर्वच पिकांना फटका बसत असल्याने जवळपास सर्वच शेतकरी सध्या मल्चिंग पेपरचा वापर करीत आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांना पिके घेणे खूपच कठीण झाले. त्याला पर्याय म्हणून साध्य शेतकरी मल्चिंग पेपर टाकून आपल्या पिकांचे संरक्षण करतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती