शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

२० किलोच्या क्रेटला मिळतोय फक्त ४० ते ५० रुपये भाव, टोमॅटो उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:47 IST

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.

ओतूर - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.टोमॅटो उत्पादनासाठी शेतकरी लागवड पूर्वमशागत, लागवड, मल्चिंग पेपर, बांधणीसाठी बांबू आदी कामासाठी विविध प्रकारच्या फवारणीनंतरतोडणीसाठी लाखो रुपये खर्च करतात.जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट आहे. सध्या या मार्केटमध्ये टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला फक्त ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळतो. या भावाने लागवडीपासून टोमॅटो मार्केटमध्ये आणण्यासाठीचा वाहतूक खर्च, तोडणी मजुरी उत्पादनासाठी जो एकूण खर्च झाला, तोही विक्रीतून मिळत नाही. फायदा नाही उलट तोटा जास्तच होतो, हे लक्षात आल्याने दुसरे पीक घेण्यासाठी टोमॅटोच्या फळांनी बहरलेल्या बागा टोमॅटोसह उपटून टाकीत आहेत. काही शेतकरी मेंढपाळांना बोलावून टोमॅटो उपटून नेण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे ऐनउन्हाळ्यात मेंढ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना अच्छे दिन आणावेत.ओतूर परिसर उदापूर, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगे व ओतूरच्या पूर्वेकडील खामुंडी, उंब्रज, डुंबरवाडी, गायमुखवाडी, उत्तरेकडील रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, पूर्वेकडील पिंपरीपेंढार या विभागात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून घेतले जाते. जिवापाड मेहनत करून शेतकरी कांदा, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकवितो, परंतु कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे तो कर्जबाजारी होत आहे.टोमॅटोच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा वापरपिंपरी पेंढार : उष्णतेपासून टोमॅटोपिकांचे संरक्षण करण्यासाठी खामुंडी (ता. जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी समीर दत्तात्रय बोडके यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर (कागद) पसरून टोमॅटो लागवड केली आहे.बदलते हवामान आणि तीव्र उन्हाळा यापासून पिकांची शेतकरीवर्ग मोठ्या कष्टाने काळजी घेत आहेत. उन्हामुळे सर्वच पिकांना फटका बसत असल्याने जवळपास सर्वच शेतकरी सध्या मल्चिंग पेपरचा वापर करीत आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांना पिके घेणे खूपच कठीण झाले. त्याला पर्याय म्हणून साध्य शेतकरी मल्चिंग पेपर टाकून आपल्या पिकांचे संरक्षण करतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती