शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल

By admin | Updated: January 14, 2017 03:03 IST

बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे

शेलपिंपळगाव : बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, पिकाची तोडणी लांबणीवर जात असून, बागेतच टोमॅटो खराब होऊ लागले आहेत. वातावरणाच्या विपरीत परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने फळांच्या बागा यशस्वी केल्या; परंतु पीक तोडणीच्या काळातच बाजारात पिकाचे दर आदळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेती चासकमान व भामा-आसखेड धरणांतील पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने खरीप, रब्बी हंगामांव्यतिरिक्त उन्हाळी हंगामातदेखील विविध पिकांच्या लागवडीखाली असतात. विशेषत: रब्बी हंगामाच्या शेवटी मागास कांदा, बाजरी, टोमॅटो पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. चालू वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या कांदाकाढणीनंतर टोमॅटो पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. रासायनिक औषधे आणि कठोर मेहनतीने लागवडयुक्त केलेल्या बागा सध्या यशस्वीरीत्या बहरून फळांनी लगडलेल्या आहेत. मात्र, तोडणीच्या काळातच बाजारात टोमॅटोचे दर नीचांकी पातळीवर आल्याने शेतकऱ्यांची कमालीची निराशा होत आहे. प्रतीनुसार १० किलोंना २० ते ४० रुपये, असा बाजारभाव मिळत असल्याने पिकावरील खर्चही उत्पादकांच्या हाती येत नाही.किमान १० किलोंना १२० ते १३० रुपये असा बाजारभाव टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित होता. मात्र, पडलेल्या बाजारभावामुळे बहुतांशी शेतकरी मालाची तोडणी लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे तोडणीला आलेली फळे सध्याच्या खराब हवामानाने वाया जात आहेत. टोमॅटो शेतातच ती झाडापासून तोडून फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. किमान मागास लागवडीच्या टोमॅटो बागांना तरी चांगला बाजारभाव प्राप्त होण्याची आशा उत्पादक शेतकरी करीत आहे.