शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल

By admin | Updated: January 14, 2017 03:03 IST

बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे

शेलपिंपळगाव : बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, पिकाची तोडणी लांबणीवर जात असून, बागेतच टोमॅटो खराब होऊ लागले आहेत. वातावरणाच्या विपरीत परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने फळांच्या बागा यशस्वी केल्या; परंतु पीक तोडणीच्या काळातच बाजारात पिकाचे दर आदळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेती चासकमान व भामा-आसखेड धरणांतील पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने खरीप, रब्बी हंगामांव्यतिरिक्त उन्हाळी हंगामातदेखील विविध पिकांच्या लागवडीखाली असतात. विशेषत: रब्बी हंगामाच्या शेवटी मागास कांदा, बाजरी, टोमॅटो पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. चालू वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या कांदाकाढणीनंतर टोमॅटो पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. रासायनिक औषधे आणि कठोर मेहनतीने लागवडयुक्त केलेल्या बागा सध्या यशस्वीरीत्या बहरून फळांनी लगडलेल्या आहेत. मात्र, तोडणीच्या काळातच बाजारात टोमॅटोचे दर नीचांकी पातळीवर आल्याने शेतकऱ्यांची कमालीची निराशा होत आहे. प्रतीनुसार १० किलोंना २० ते ४० रुपये, असा बाजारभाव मिळत असल्याने पिकावरील खर्चही उत्पादकांच्या हाती येत नाही.किमान १० किलोंना १२० ते १३० रुपये असा बाजारभाव टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित होता. मात्र, पडलेल्या बाजारभावामुळे बहुतांशी शेतकरी मालाची तोडणी लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे तोडणीला आलेली फळे सध्याच्या खराब हवामानाने वाया जात आहेत. टोमॅटो शेतातच ती झाडापासून तोडून फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. किमान मागास लागवडीच्या टोमॅटो बागांना तरी चांगला बाजारभाव प्राप्त होण्याची आशा उत्पादक शेतकरी करीत आहे.