शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

व्यवस्थापन समितीकडून टोलवाटोलवी, शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 01:49 IST

प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढत शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी (दि.१८) हे परिपत्रक काढले. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्याकरिता मुख्याध्यापकांना तपशीलासह काही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी पूर्व तयारीचा भाग म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग यांच्यावर काही जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. शाळा निर्जंतुकीकरण, पालकांशी संवाद, पाठ्यपुस्तक वाटप, स्थलांतरितांना प्रवेश, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी कामांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा समिती आणि ग्रामपंचायतीने एकत्रित घ्यावयाचा असला तरी समिती सदस्य मात्र या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. ते मुख्याध्यापकांकडे चेंडू टोलावत आहेत.>दिवसाआड शाळा भरवण्याचा विचारशाळेच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्याकरिता दिवसाआड वर्ग भरवण्याचा विचार शिक्षण विभागाने मांडला आहे. तीन तासांच्या अंतराने वर्ग सुरू करण्याचा तसेच सम-विषम दिवस पाळण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र ही सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित केली गेली आहे.शैैक्षणिक वर्षाच्या तयारीवर प्रश्नचिन्हजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे पाचशे शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींनी थकविले आहे. तर शाळा निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींकडे कुठल्याही निधीची तरतूद नाही. त्यामुळे एकूणच तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.