शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

व्यवस्थापन समितीकडून टोलवाटोलवी, शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 01:49 IST

प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढत शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी (दि.१८) हे परिपत्रक काढले. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्याकरिता मुख्याध्यापकांना तपशीलासह काही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी पूर्व तयारीचा भाग म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग यांच्यावर काही जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. शाळा निर्जंतुकीकरण, पालकांशी संवाद, पाठ्यपुस्तक वाटप, स्थलांतरितांना प्रवेश, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी कामांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा समिती आणि ग्रामपंचायतीने एकत्रित घ्यावयाचा असला तरी समिती सदस्य मात्र या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. ते मुख्याध्यापकांकडे चेंडू टोलावत आहेत.>दिवसाआड शाळा भरवण्याचा विचारशाळेच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्याकरिता दिवसाआड वर्ग भरवण्याचा विचार शिक्षण विभागाने मांडला आहे. तीन तासांच्या अंतराने वर्ग सुरू करण्याचा तसेच सम-विषम दिवस पाळण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र ही सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित केली गेली आहे.शैैक्षणिक वर्षाच्या तयारीवर प्रश्नचिन्हजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे पाचशे शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींनी थकविले आहे. तर शाळा निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींकडे कुठल्याही निधीची तरतूद नाही. त्यामुळे एकूणच तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.