शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्यवस्थापन समितीकडून टोलवाटोलवी, शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 01:49 IST

प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढत शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी (दि.१८) हे परिपत्रक काढले. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्याकरिता मुख्याध्यापकांना तपशीलासह काही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी पूर्व तयारीचा भाग म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग यांच्यावर काही जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. शाळा निर्जंतुकीकरण, पालकांशी संवाद, पाठ्यपुस्तक वाटप, स्थलांतरितांना प्रवेश, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी कामांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा समिती आणि ग्रामपंचायतीने एकत्रित घ्यावयाचा असला तरी समिती सदस्य मात्र या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. ते मुख्याध्यापकांकडे चेंडू टोलावत आहेत.>दिवसाआड शाळा भरवण्याचा विचारशाळेच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्याकरिता दिवसाआड वर्ग भरवण्याचा विचार शिक्षण विभागाने मांडला आहे. तीन तासांच्या अंतराने वर्ग सुरू करण्याचा तसेच सम-विषम दिवस पाळण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र ही सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित केली गेली आहे.शैैक्षणिक वर्षाच्या तयारीवर प्रश्नचिन्हजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे पाचशे शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींनी थकविले आहे. तर शाळा निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींकडे कुठल्याही निधीची तरतूद नाही. त्यामुळे एकूणच तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.