शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

निवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 21, 2015 00:44 IST

देशाच्या लौकिकात भर घालणाऱ्या फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआय) दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांवर निवृत्तीवेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.

पुणे : देशाच्या लौकिकात भर घालणाऱ्या फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआय) दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांवर निवृत्तीवेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. ३०-४० वर्षांपासून अनेक कर्मचारी पेन्शन मिळावे म्हणून खेटा घालत आहेत. १९७३ ते १९८३ या कालावधीत एफटीआयआयमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पेन्शन सुविधा सुरू न झालेल्यांमध्ये समावेश आहे. प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. एफटीआयमधील या कर्मचाऱ्यांना जीपीएफ (गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंड फंड) ही योजना लागू आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना सीपीएफमध्ये (कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना) वर्ग करण्यात आले. त्याबाबत त्यांना काही माहितीही देण्यात आली नाही. मुळात हे वर्गीकरणच कर्मचाऱ्यांना मान्य नाही. गेल्या ३०-४० वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोग्याच्या सुविधांसाठी पैसे नाहीत. निवृत्तीनंतर मिळालेली लाख-सव्वालाख रुपयांची ग्रॅज्युएटीची रक्कम कधीच संपली. महागाईच्या दिवसांत उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. ३०-३५ वर्षे इनामेइतबारे सेवा करूनही अखेरीस होत असलेली ससेहोलपट कधी संपेल, असा प्रश्न या निवृत्त कर्मचाऱ्यांना पडला आहे.(प्रतिनिधी)याविषयी ‘लोकमत’कडे कैफियत मांडताना एम. के. वीर म्हणाले, ‘‘पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे, असा कुठलाही अध्यादेश नाही. याविषयी विचारणा केली असता कुणीही ठोस माहिती देत नाही. धर्मदाय आयुक्तांनीही, या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युइटी द्या, असे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव १९८७ मध्ये येथे आले असता त्यांच्यासमोर पेन्शनचा प्रश्न उपस्थित केला. पण एफटीआयआयने पेन्शनसंदर्भातील कागदपत्रे मंत्रालयाकडे पाठविली नसल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शनसंदर्भातील पत्र का पाठविण्यात आले नाही, याची माहिती मिळालेली नाही.’’ पेन्शनसंदर्भात ७ मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्याची माहिती वारंवार मागण्यात आली. अधिकाऱ्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत सर्वांना पत्र, निवेदन दिले; पण त्याचा काही उपयोग झाला नसल्याची व्यथा वीर यांनी मांडली. याबाबत दखल घेऊन पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी २४ फेब्रुवारी रोजी उपोषण करणार असल्याचे वीर यांनी सांगितले. या प्रश्नासंदर्भात एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की कर्मचाऱ्यांना सीपीएफ योजना लागू आहे. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून केंद्रस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. पेन्शनसंदर्भात या कर्मचाऱ्यांना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे.