शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

कालौघात नाट्यव्यवसायाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: June 26, 2017 03:33 IST

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे. त्यांनी जवळपास पन्नास वर्षे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. शहरात नाट्यगृहांची उभारणी झाल्यानंतर नाट्यप्रयोग, आॅर्केस्ट्रा, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आजवर नाटकांमध्ये हौसेपोटी भूमिका केल्या. महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर झाल्याचा आनंद नक्कीच आहे, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्णमहोत्सवी सोहळा ही अनेक आठवणींना उजाळा देणारी घटना आहे. १९६१ मध्ये अनंत जाधव महानगरपालिकेचे सहायक आयुक्त असताना पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी झाली. २६ जून १९६८ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. या वेळी आचार्य अत्रे, पं. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. बी. जी. शिर्के यांनी रंगमंदिराचे बांधकाम केले होते. उद्घाटनानंतर संपूर्ण जुलै महिना अत्रे थिएटर्सची ‘डॉक्टर’, ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’ अशा नाटकांचे आलटून पालटून प्रयोग होत होते. या सर्व नाटकांचे व्यवस्थापन करण्याचे भाग्य मला लाभले. त्या वेळी मनोरंजन नाट्यसंस्थेची स्थापना झाली नव्हती. १९६९ मध्ये संस्था नावारूपाला आली. ते म्हणाले, ‘मी १९५०पासून नाट्यसृष्टीत कार्यरत होतो. सरस्वती मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरस्वती मंदिर नटसंघाची स्थापना केली होती. त्या वेळी मी ‘संगीत म्युन्सिपाल्टी’, ‘पराचा कावळा’ आदी नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक राज्यस्पर्धेमध्ये सादर केले. त्यानंतर त्या नाटकाचे चार प्रयोग झाले. पुढे या नाटकावरून वाद झाला आणि नाटक कंपनीतून अनेक जण वेगळे झाले. त्यानंतर १९७० मध्ये थिएटर अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात आली. या कंपनीच्या सर्व नाटकांची व्यवस्था मनोरंजन नाट्यसंस्थेकडे होती. ‘पडघम’, ‘तीन पैशांचा तमाशा’ अशा नाटकांचेही अनेक प्रयोग झाले. सुयोग, कलावैभव, नाट्यसंपदा या सर्व नाटक कंपन्यांचे व्यवस्थापन मनोरंजनकडे होते. मी सरकारी नोकरीमध्ये रात्रपाळी करून मनोरंजन नाट्यसंस्थेचा व्याप सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांशी संबंध प्रस्थापित झाले. रंगभूमीची सेवा करण्याची यानिमित्ताने संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. नाट्यव्यवसाय हा अत्यंत चमत्कारिक व्यवसाय आहे. ऐंशीच्या दशकात या व्यवसायात काम करणारे अनेक जण व्यसनाधीनतेच्या आहारी गेले. त्यामुळे अनेक जण व्यवसायापासून दूर गेले. पूर्वीच्या तुलनेत आता नाट्यव्यवस्थापन सोपे झाले आहे. केवळ बुकिंग करणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे. पूर्वी आम्ही सायकलवरून हिंडत. छपाई करणे, बोर्ड रंगवणे, वर्तमानपत्रांना जाहिरात नेऊन देणे, अशी सर्व कामे आम्ही करायचो. फोन, इंटरनेट आल्यानंतर, ही सर्व धावपळ संपली. शहराचा विस्तार झाला, नाट्यगृहांची संख्या वाढली त्याप्रमाणे नाट्यव्यवसायाचे स्वरूपही बदलले. पूर्वी मनोरंजन नाट्यसंस्थेतर्फे वासंतिक नाट्यमहोत्सव आयोजित केला जात असे. खुल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून नाटके सादर केली जात असत. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाल्यावर हा महोत्सव बंद करण्यात आला.’आजकाल रसिकांची नाटकाबाबतची अभिरुची बदलली आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने नाटकांकडे वळण्याची गरज आहे. पूर्वी ‘हॅम्लेट’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ अशा पूर्वीच्या नाटकांचे प्रयोग पुन्हा झालेच नाहीत. अभिनय, गायन यांचे प्रमाणही कमी झाले आहे. आजकाल बोलीभाषेतील नाटके जास्त चालतात. नाटकांच्या माध्यमातून तरुण आणि मुलांच्या आवडीचे विषय हाताळण्याची गरज आहे. नाट्यव्यवस्थापन क्षेत्रातील प्रवासाचा वेध घेणारे लिखाण मी वि. भा. देशपांडे यांच्या ‘एनसायक्लोपीडिया’ यामध्ये प्रसिद्ध झाला. भविष्यात शक्य झाल्यास या प्रवासाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.