शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ

By admin | Updated: March 25, 2017 03:29 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही.

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करूनदेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. विकत पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.तालुक्यातील माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क.प., रसाळवाडी, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी परिसरात याही वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेतून पाणी चार-चार दिवस येत नाही. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावर जावे लागते. एकीकडे ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा तगाता लावला आहे. वर्षाकाठी १००० रुपये पाणीपट्टी आकारली जात असताना दररोज पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र, काऱ्हाटीसारख्या मोठ्या गावात जास्त लोकसंख्येच्या तुलनेत पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुन्हा विकत घेण्याची वेळ आली आहे. वाड्यावस्त्यांवरील बहुतांश भागातील विहिरींचा तळ उघडा पडला आहे. उपलब्ध पाणी क्षारयुक्त आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा? पाणी कोठून आणायचे? अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी चिंतातुर झाला आहे. (वार्ताहर)